शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र आघाडीवर मोदी सरकार ‘फेल’

By admin | Updated: July 18, 2015 03:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे त्यांचे समपदस्थ नवाज शरीफ यांच्यादरम्यान रशियाच्या उफामध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचा पवित्रा बघून परराष्ट्र धोरणाच्या

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे त्यांचे समपदस्थ नवाज शरीफ यांच्यादरम्यान रशियाच्या उफामध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानचा पवित्रा बघून परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याच्या निष्कर्षाप्रत काँग्रेस पोहोचली आहे.माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी या मुद्यावर मोदी सरकारवर प्रहार करताना निव्वळ पोलिसांच्या दंडुकेशाहीने परराष्ट्र धोरण राबविता येत नाही, असा टोमणा मारला. त्यांचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडे होता. डोवल हे सध्या परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत मोदींचा डोळा आणि कान झाले आहेत. खुर्शीद यांनी यापूर्वीचे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि मोदी सरकारने पाकिस्तानसंदर्भात अवलंबलेल्या धोरणाचाही तुलनात्मक आढावा घेतला. ते म्हणाले की, संपुआ शासनकाळात जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेता पाकिस्तानसोबत चर्चेची गरज वेळोवेळी व्यक्त करण्यात आली. परंतु आम्ही डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवले. त्यावेळी विरोधकांच्या भूमिकेत असलेली भाजपा मात्र याचा विरोध करीत होती. एकीकडे मोदी आणि शरीफ हातमिळवणी करीत असताना पाक मात्र अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहे. असे यापूर्वी कधी घडले का? पाकने भारताचा नेहमीच विश्वासघात केला आहे. हे चांगल्या पद्धतीने माहीत असूनही सरकारने डोळे बंद केले आहे. उफामध्ये मोदी-शरीफ बैठकीनंतर सीमेवर सतत गोळीबार सुरू आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यत पाकने ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. चर्चेनंतर १८ नागरिक आणि १२ जवान शहीद झाले, याकडेही खुर्शीद यांनी लक्ष वेधले.चीनला ओळखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकचे समर्थन केले. आम्हाला हे का समजू शकले नाही. आफ्रिकेला महत्त्व न देण्याची चूक हे सरकार करीत आहे. जेथून पैसा मिळेल त्यांच्यासोबतच जायला पाहिजे,असे या सरकारचे मत आहे. परंतु ही भूमिका योग्य नाही.पाकिस्तानसोबत अवश्य चर्चा करा. परंतु भूतकाळातील अनुभवांचेही स्मरण ठेवा. कारगील का,केव्हा आणि कसे झाले. डोळे आणि कान उघडे ठेवण्याची गरज आहे. चर्चेसाठी निश्चित डावपेच असले पाहिजेत,असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला. मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या आधारे आम्हाला जास्त दूरचा पल्ला गाठता येणार नाही,असेही स्पष्ट केले.चीनला ओळखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाच्या मुद्यावर पाकचे समर्थन केले. आम्हाला हे का समजू शकले नाही. पंतप्रधान ज्या पद्धतीने स्वत:चे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याने काही फायदा होणार नाही, अशी तोफ खुर्शीद यांनी डागली. पाकिस्तानसोबत अवश्य चर्चा करा. परंतु भूतकाळातील अनुभवांचेही स्मरण ठेवा, असा सल्लाही खुर्शीद यांनी मोदी यांना दिला.