शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार गरिबांना समर्पित

By admin | Updated: May 21, 2014 02:54 IST

मोदींना सरकार स्थापनेसाठी पाचारण करताना राष्ट्रपतींनी रालोआचे नव्हे, तर केवळ भाजपाचे २८२ हे संख्याबळ विचारात घेतले. ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ ३३६ एवढे आहे

नवी दिल्ली : कठोर राजकारण्याची प्रतिमा असलेले भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पायर्‍यांवर नतमस्तक होत संसदेत प्रवेश केल्याने आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आपले सरकार गरिबांना समर्पित करताना त्यांनी केलेल्या भावुक तरीही आश्वासक भाषणाने राजधानीतील राजकीय नूरच पालटून गेला. मग रालोआच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावावर झालेले शिक्कामोर्तब, राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी केलेले पाचारण या औपचारिकताही भावुक अंगानेच पूर्ण झाल्या. तसेच मोदी सरकार २६ तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार्‍या शपथविधीनंतर दिल्लीचे तख्त सांभाळणार, यावरही शिक्कामोर्तब झाले. मोदींना सरकार स्थापनेसाठी पाचारण करताना राष्ट्रपतींनी रालोआचे नव्हे, तर केवळ भाजपाचे २८२ हे संख्याबळ विचारात घेतले. ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ ३३६ एवढे आहे. स्पष्ट बहुमतासाठी २७२ एवढ्या खासदारांची आवश्यकता असून एकट्या भाजपाकडे त्यापेक्षा जास्तच संख्याबळ आहे. रालोआच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव सुचविल्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि एम़ वेंकय्या नायडू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत नेता निवडीचा उपचार पूर्ण केला.