शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मोदी सरकार गरिबांना समर्पित

By admin | Updated: May 21, 2014 02:54 IST

मोदींना सरकार स्थापनेसाठी पाचारण करताना राष्ट्रपतींनी रालोआचे नव्हे, तर केवळ भाजपाचे २८२ हे संख्याबळ विचारात घेतले. ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ ३३६ एवढे आहे

नवी दिल्ली : कठोर राजकारण्याची प्रतिमा असलेले भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पायर्‍यांवर नतमस्तक होत संसदेत प्रवेश केल्याने आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आपले सरकार गरिबांना समर्पित करताना त्यांनी केलेल्या भावुक तरीही आश्वासक भाषणाने राजधानीतील राजकीय नूरच पालटून गेला. मग रालोआच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावावर झालेले शिक्कामोर्तब, राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी केलेले पाचारण या औपचारिकताही भावुक अंगानेच पूर्ण झाल्या. तसेच मोदी सरकार २६ तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार्‍या शपथविधीनंतर दिल्लीचे तख्त सांभाळणार, यावरही शिक्कामोर्तब झाले. मोदींना सरकार स्थापनेसाठी पाचारण करताना राष्ट्रपतींनी रालोआचे नव्हे, तर केवळ भाजपाचे २८२ हे संख्याबळ विचारात घेतले. ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ ३३६ एवढे आहे. स्पष्ट बहुमतासाठी २७२ एवढ्या खासदारांची आवश्यकता असून एकट्या भाजपाकडे त्यापेक्षा जास्तच संख्याबळ आहे. रालोआच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव सुचविल्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि एम़ वेंकय्या नायडू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत नेता निवडीचा उपचार पूर्ण केला.