शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मोदी सरकार घटनात्मक मूल्ये आणि परंपराविरोधी, सोनिया गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 19:59 IST

मोदी सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मूल्ये आणि स्थापित परंपरांच्याविरोधात उभे आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला.

नवी दिल्ली - देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एक संदेश प्रसारित करून यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मूल्ये आणि स्थापित परंपरांच्याविरोधात उभे आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला.स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सोनिया गांधी म्हणाल्या की, केवळ लोकशाही मूल्ये, विविध भाषा, धर्म आणि संप्रदायांच्या विपुलतेमुळेच नव्हे तर आपल्या भारताची कीर्ती ही प्रतिकूल परिस्थितीचाही एकजुटीने सामना करण्यासाठीही पसरलेली आहे. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाशी झुंजत आहे. या परिस्थितीत भारताने एकजुट होऊन या साथीचा सामान केला पाहिजे. आपण सर्वजण एकत्र येऊन ही साथ आणि गंभीर आर्थिक संकटामधून बाहेर येऊ, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते, असे सोनिया गांधी म्हणाल्या., गेल्या ७४ वर्षांच्या काळात आपण लोकशाही मूल्यांना वेळोवेळी परीक्षेच्या कसोटीवर परखून पाहिले आहे. तसेच नियमितपणे त्यात अधिकाधिक सुधारणा केली आहे. मात्र आजच्या काळात सरकार हे लोकशाही व्यवस्था, घटनात्मक मुल्ये आणि स्थापित परंपरांच्या विरोधात उभे आहे, असे वाटते. भारतीय लोकशाहीसाठी हा चिंतेचा काळ आहे, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला.यावेळी सोनिया गांधी यांनी चीन आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या संघर्षावरही आपलं मत मांडलं. कर्नल संतोषबाबू आणि आमच्या २० जवानांना गलवान खोऱ्यात वीरमरण आल्याच्या घटनेला आता साठ दिवस होऊन गेले आहेत. मी त्यांचे स्मरण करून त्यांच्या हौतात्म्याला वंदन करते. आता सरकारनेही त्यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांचा योग्य तो सन्मान करावा, असे मी सरकारला आवाहन करते, असे सोनिया गांधी म्हणाल्या.स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे. आज देशात बोलण्याचे, लिहिण्याचे, प्रश्न विचारण्याचे, असहमती व्यक्त करण्याचे, विचार मांडण्याचे, उत्तर मागण्याचे स्वातंत्र्य आहे का? याचा विचार देशातील जनतेने अंतरात्म्याला स्मरून करावा. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही देशाचे लोकशाहीच्या रक्षणासाठी शक्य तेवढी मदत करू.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार