शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:48 IST

बिहार, आंध्र प्रदेशला मोदी सरकारने मोठी भेट दिली असून पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलीय

PM Modi Cabinet Approves New Rail Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांचाही समावेश आहे, ज्याचा फायदा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहारला होणार आहे. या रेल्वे प्रकल्पांवर ६,७९८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीआधीच आंध्र प्रदेश आणि बिहारला मोठं गिफ्ट दिलं आहे. लोकसभा निकालानंतर एनडीएच्या सत्ता स्थापनेत या दोन्ही राज्यांचा मोठा वाटा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. एक आंध्र प्रदेशातील अमरावती आणि दुसरा उत्तर बिहारला ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा. ६,७९८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे उद्दिष्ट आहे, जे एकूण ३१३ किलोमीटरचे असणार आहे. यासोबतच मंत्रिमंडळात आज एकूण ९,१७,७९१ कोटी रुपयांच्या सात क्षेत्रातील प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ, बंदर, महामार्ग, रेल्वे, मेट्रो, औद्योगिक आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. रेल्वेसाठी ५१,८०१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण १२ रेल्वे प्रकल्प आणि वाराणसीतील एका नवीन पुलाचा समावेश आहे.

पहिला प्रकल्प, ८७ किमी लांबीचा, अमरावती रेल्वे मार्ग आहे, ज्याची अंदाजे किंमत २,२४५ कोटी रुपये आहे. हा नवीन रेल्वे मार्ग हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांना थेट रेल्वे मार्गाने जोडेल. तसेच मछलीपट्टणम, कृष्णपट्टणम आणि काकीनाडा या बंदरांना जोडला जाणार आहे. तर दुसरा प्रकल्पामुळे उत्तर बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमधील प्रवास सुखकर होणार आहे. ४,५५३ कोटी रुपये खर्चाच्या या दुहेरी मार्गाच्या रेल्वे मार्गावर ४० हून अधिक पूल असतील. सुधारित पायाभूत सुविधांमुळे लोक, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुलभ होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडींच्या समितीने दोन्ही प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यांची किंमत अंदाजे ६,७८९ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेले हे प्रकल्प भारतीय रेल्वेचे जाळे अंदाजे ३१३ किलोमीटरने वाढवतील.

नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे १६८ गावांना जोडेल आणि नऊ नवीन स्थानकांसह सुमारे १२ लाख लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सीतामढी आणि मुझफ्फरपूर या दोन्ही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच यामुळे सुमारे ३८८ गावे आणि सुमारे नऊ लाख लोकांना याचा फायदा होईल. कृषी उत्पादने, खते, कोळसा, लोखंड, पोलाद आणि सिमेंट यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे मार्ग महत्त्वाचे आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वे