शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मोदींना बिहारी झटका

By admin | Updated: November 9, 2015 03:41 IST

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नरेंद्र मोदी-अमित शहा या करामती जोडीच्या जोरावर चौखूर उधळलेल्या भारतीय जनता पार्टीला बिहारच्या जनतेने रविवारी बिहारी झटका दाखवला.

पाटणा : लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नरेंद्र मोदी-अमित शहा या करामती जोडीच्या जोरावर चौखूर उधळलेल्या भारतीय जनता पार्टीला बिहारच्या जनतेने रविवारी बिहारी झटका दाखवला. मोदी व शहा यांनी स्वत: शंभरहून अधिक प्रचारसभा घेऊन, अत्यंत प्रतिष्ठेच्या बनविलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला. सांप्रदायिक शक्तींना बिहारमध्ये पाय रोवू द्यायचा नाही, या पक्क्या इराद्याने एकत्र आलेल्या नितीशकुमार, लालूप्रसाद व काँग्रेस यांच्या महाआघाडीने तीनचतुर्थांंश असे घवघवीत बहुमत मिळवले.सर्व २४३ मतदारसंघांचे निकाल हाती आले, त्यावरून महाआघाडीला १७८ व भाजपा आणि मित्रपक्षांना ५८ जागा मिळाल्या आहेत. महाआघाडीतील लालूंच्या राष्ट्रीय जनता दलास ८० तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास ७१ जागा मिळाल्या, तरी आधी ठरल्याप्रमाणे नितीश हेच मुख्यमंत्री होतील, असे लालूंनी स्पष्ट केले. नितीश बिहारचे राज्य सांभाळतील व आपण स्वत: दिल्लीत राहून संपूर्ण देशातून भाजपाचा ‘सुकडा साफ’ करण्याच्या कामाला लागू, असेही लालू प्रसाद यांनी जाहीर केले.वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलेल्या भाजपाने, बिहारची सत्ता काबीज करण्यास हरतऱ्हेचे हातखंडे वापरले. सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यापासून ते व्यक्तिगत चिखलफेक करण्यापर्यंत पातळी गाठत विखारी प्रचार केला. सव्वा लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे आमिषही दाखविले, परंतु बिहारच्या जनतेने अशी काही चपराक दिली की, सत्ता तर दूरच, पण भाजपाला गेल्या निवडणुकीत होत्या तेवढ्या जागा कायम राखणेही जमले नाही. २०१० च्या निवडणुकीत ९१ जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या झोळीत ५३ जागाच पडल्या. मित्रपक्षांनी यात आणखी पाच जागांची भर टाकली, पण त्याने भाजपाची नाचक्की कमी झाली नाही. डाव्या पक्षांना मात्र खातेही खोलता आले नाही. मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने दोन जागा जिंकल्या.

महाआघाडी  

जदयू -  ७१ जागांवर विजयी

राजद -  ८० जागांवर विजयी 

काँग्रेस - २७ जागांवर विजयी  

एकूण  - १७८ जागांवर विजयी

भाजपाप्रणित रालोआ

भाजपा -  ५३ जागांवर विजयी

लोकजनशक्ती पार्टी - २ जागांवर विजयी

राष्ट्रील लोकसमाज पक्ष - २ जागांवर विजयी 

हिंदूस्तान आवाम मोर्चा - १ जागांवर विजयी

एकूण  -  ५८ जागांवर विजयी

 

इतर ७ जागांवर विजयी झाले आहेत.  

मोदी ज्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत, ती गाडी गेल्या १८ महिन्यांपासून सुरूच झालेली नाही. मोदीजी जरा एक्सलेटर दाबा, गाडी पुढे न्या, नाहीतर जनताच तुम्हाला गाडीतून खेचून बाहेर फेकून देईल. - राहुल गांधीका झाला भाजपाचा पराभव?महागाई, नेत्यांची बेछूट विधानेमुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणेमित्रपक्षांची नाराजी, नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली असहिष्णू वागणूकसरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या विरोधात केलेले वक्तव्यपंतप्रधान मोदींचा नितीशकुमारांना फोनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी फोन करून नितीशकुमार यांचे अभिनंदन केले. निकाल काहीही लागला असला, तरी प्रचारात जाहीर केलेले पॅकेज बिहारला दिले जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.हा बिहारच्या स्वाभिमानाचा विजय आहे. काट्याची टक्कर आहे, म्हणणाऱ्यांना जनतेने दाखवून दिले आहे. - नितीशकुमार बिहार सरकारला आमच्या शुभेच्छा ! : ‘बिहारला विकासाच्या नव्या मार्गावर नेण्यासाठी नव्या सरकारला आमच्या हार्दिक शुभेच्छा. विजयाबद्दल मी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो. - अमित शहा