शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिक्स परिषदेनंतर मोदी जाणार म्यानमारला; रोहिंग्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान चर्चा करणार का ? 

By अोंकार करंबेळकर | Updated: September 2, 2017 15:45 IST

गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे.

मुंबई, दि २- गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे. देशात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवशनात माहिती दिली होती. या रोहिंग्यांना माघारी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र सरकारच्या या कल्पनेवर भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी टीका केली होती. हैदराबाद येथे राहणाऱ्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा परंतु परत मायदेशी पाठवू नका अशी विनंती केली आहे. 

गेल्या आठवडाभरात रखाइन प्रांतातील रोहिंग्या, रखाइन, बौद्ध व हिंदू या सर्वांचे जीवन विस्कळीत झाले आहे. येथे निर्माण झालेल्या तणावात ४०० लोकांचे प्राण गेले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या बळावर रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलण्याच्या प्रक्रियेवर संपूर्ण जगाने टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राने आंग सान सू ची यांच्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहिंग्यांचा मुद्दा चर्चेमध्ये उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान ६ आणि ७ सप्टेंबर असे दोन दिवस म्यानमार दौऱ्यावर असतील. राजधानी नायपीडाँवमध्ये भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रोहिंग्यांचा प्रश्न नक्की आहे तरी काय ? 2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध रखाईन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील अशी भिती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशिररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरुच आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी