शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

ब्रिक्स परिषदेनंतर मोदी जाणार म्यानमारला; रोहिंग्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान चर्चा करणार का ? 

By अोंकार करंबेळकर | Updated: September 2, 2017 15:45 IST

गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे.

मुंबई, दि २- गेल्या आठवडाभरात म्यानमारमधील वांशिक तणाव पुन्हा उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेनंतर म्यानमारला जात असून या भेटीत ते रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

भारतामध्ये ४० हजार रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे. देशात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवशनात माहिती दिली होती. या रोहिंग्यांना माघारी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र सरकारच्या या कल्पनेवर भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी टीका केली होती. हैदराबाद येथे राहणाऱ्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा परंतु परत मायदेशी पाठवू नका अशी विनंती केली आहे. 

गेल्या आठवडाभरात रखाइन प्रांतातील रोहिंग्या, रखाइन, बौद्ध व हिंदू या सर्वांचे जीवन विस्कळीत झाले आहे. येथे निर्माण झालेल्या तणावात ४०० लोकांचे प्राण गेले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या बळावर रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलण्याच्या प्रक्रियेवर संपूर्ण जगाने टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राने आंग सान सू ची यांच्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहिंग्यांचा मुद्दा चर्चेमध्ये उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान ६ आणि ७ सप्टेंबर असे दोन दिवस म्यानमार दौऱ्यावर असतील. राजधानी नायपीडाँवमध्ये भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रोहिंग्यांचा प्रश्न नक्की आहे तरी काय ? 2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध रखाईन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील अशी भिती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशिररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरुच आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी