शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या काळात मोबाईल रिचार्ज ९४ टक्क्यांनी स्वस्त झाले, दरात वाढ योग्यच; ज्योतिरादित्य शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:01 IST

Mobile Recharge Hike: आता दर महिन्याला २५० ते ३५० रुपये खर्च करावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी हेच दर १००-१२० रुपयांवर होते.

वाढत्या महागाईत मोबाईल कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी रिचार्जचे प्लॅनचे दर वाढविले आहेत. आता दर महिन्याला २५० ते ३५० रुपये खर्च करावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी हेच दर १००-१२० रुपयांवर होते. यावर आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुद्देसूद गणित मांडत मोदींच्या कार्यकाळात मोबाईलचे रिचार्ज ९४ टक्क्यांनी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे. 

शिंदे यांनी आज लोकसभेत याची माहिती दिली. २०१४ मध्ये देशात ९० कोटी मोबाईल फोन ग्राहक होते. आज ही संख्या वाढून ११६ कोटी झाली आहे. इंटरनेट उपभोक्त्यांची संख्या तेव्हा २५ कोटी होती ती आता ९७.४४ कोटी झाली आहे. जेव्हा युजरची संख्या वाढते तेव्हा रिचार्ज दरांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते, असे शिंदे म्हणाले. एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. मोबाईल कंपन्यांनी मिळून टॅरिफ वाढवल्याचे सरकारला माहिती आहे का? ११९ कोटी मोबाईल ग्राहकांवर ३४,८२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडल्याचे सुरजेवाला म्हणाले होते. 

यावेळी शिंदे यांनी २०१४ मध्ये एका मिनिटाला किती पैसे आकारले जायचे हे देखील सांगितले. तेव्हा एका मिनिटासाठी ५० पैसे चार्ज होता. आता तो ३ पैसे आहे. १ जीबी डेटाची किंमत २७० रुपये होती, ती आता ९.७० रुपये झाली आहे. म्हणजेच यात ९३ टक्क्यांची कपात झाली आहे. भारतातील इंटरनेट डेटा दर जगात सर्वात स्वस्त आहे, असेही ते म्हणाले. 

दरात वाढ योग्यच...5G आल्याने या दरांत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही शिंदे म्हणाले. गेल्या २२ महिन्यांत ९८% जिल्हे आणि ८२% लोकसंख्या ५जी नेटवर्कशी जोडली गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यासाठी कंपन्यांनी ४.५ लाख कोट रुपये गुंतविले आहेत. एवढ्या प्रचंड गुंतवणुकीवर परतावा मिळणे देखील गरजेचे आहे. यामुळे मोबाईल रिचार्जच्या दरात केलेली वाढ योग्य आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMobileमोबाइल