शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

मोदींच्या काळात मोबाईल रिचार्ज ९४ टक्क्यांनी स्वस्त झाले, दरात वाढ योग्यच; ज्योतिरादित्य शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:01 IST

Mobile Recharge Hike: आता दर महिन्याला २५० ते ३५० रुपये खर्च करावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी हेच दर १००-१२० रुपयांवर होते.

वाढत्या महागाईत मोबाईल कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी रिचार्जचे प्लॅनचे दर वाढविले आहेत. आता दर महिन्याला २५० ते ३५० रुपये खर्च करावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी हेच दर १००-१२० रुपयांवर होते. यावर आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुद्देसूद गणित मांडत मोदींच्या कार्यकाळात मोबाईलचे रिचार्ज ९४ टक्क्यांनी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे. 

शिंदे यांनी आज लोकसभेत याची माहिती दिली. २०१४ मध्ये देशात ९० कोटी मोबाईल फोन ग्राहक होते. आज ही संख्या वाढून ११६ कोटी झाली आहे. इंटरनेट उपभोक्त्यांची संख्या तेव्हा २५ कोटी होती ती आता ९७.४४ कोटी झाली आहे. जेव्हा युजरची संख्या वाढते तेव्हा रिचार्ज दरांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते, असे शिंदे म्हणाले. एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. मोबाईल कंपन्यांनी मिळून टॅरिफ वाढवल्याचे सरकारला माहिती आहे का? ११९ कोटी मोबाईल ग्राहकांवर ३४,८२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडल्याचे सुरजेवाला म्हणाले होते. 

यावेळी शिंदे यांनी २०१४ मध्ये एका मिनिटाला किती पैसे आकारले जायचे हे देखील सांगितले. तेव्हा एका मिनिटासाठी ५० पैसे चार्ज होता. आता तो ३ पैसे आहे. १ जीबी डेटाची किंमत २७० रुपये होती, ती आता ९.७० रुपये झाली आहे. म्हणजेच यात ९३ टक्क्यांची कपात झाली आहे. भारतातील इंटरनेट डेटा दर जगात सर्वात स्वस्त आहे, असेही ते म्हणाले. 

दरात वाढ योग्यच...5G आल्याने या दरांत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही शिंदे म्हणाले. गेल्या २२ महिन्यांत ९८% जिल्हे आणि ८२% लोकसंख्या ५जी नेटवर्कशी जोडली गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यासाठी कंपन्यांनी ४.५ लाख कोट रुपये गुंतविले आहेत. एवढ्या प्रचंड गुंतवणुकीवर परतावा मिळणे देखील गरजेचे आहे. यामुळे मोबाईल रिचार्जच्या दरात केलेली वाढ योग्य आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMobileमोबाइल