शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

आपचे आमदार मोदींच्या ‘दारी’

By admin | Updated: June 27, 2016 04:30 IST

सिसोदिया यांच्या नेतृत्वात ५२ आमदारांनी रविवारी सांकेतिक ‘शरणागती’ पत्करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली.

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात ५२ आमदारांनी रविवारी सांकेतिक ‘शरणागती’ पत्करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी मोदींच्या ७ रेसकोर्स निवासस्थानापासून एक किमी अंतरावर अति सुरक्षित क्षेत्रात हा मार्च रोखत आमदारांना ताब्यात घेतले. आमदारांचा हा ‘हाय ड्रामा’राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून केंद्र आणि राज्य संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सिसोदिया यांच्यासह सहा मंत्र्यांचाही समावेश होता. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल या आमदारांना रेसकोर्स मेट्रो स्थानकाजवळ ताब्यात घेण्यात आल्यानंतर संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.आम्ही आपचे सर्व आमदार एकजुटीने पंतप्रधानांकडे गेलो होतो. पंतप्रधानांना आम्हाला कारागृहात पाठविण्याचे राजकारण करायचे असल्यास आम्ही सर्वजण तुमच्याकडे येतो. आम्हाला सर्वांना कारागृहात पाठवा. दिल्ली पोलीस किमान बलात्काऱ्यांना तरी अटक करू शकतात, हे सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण आम्हाला ताब्यात घेऊन सोडण्यात आले, असे सिसोदिया यांनी म्हटले. तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी आमदारांची बैठक बोलावली. विधानसभाध्यक्ष रामनिवास गोयल आणि उपाध्यक्ष राखी बिर्ला हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर केजरीवाल टिष्ट्वटमध्ये म्हणाले, मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ते ७ रेसकोर्स या पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन शरणागती पत्करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क) >दिली सरकार-भाजपात का उडाली संघर्षाची ठिणगी?दिल्लीच्या ७० सदस्यीय विधानसभेत आपचे ६७ आमदार आहेत. आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी लैंगिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचाराबद्दल पोलिसांनी अटक केली होती. त्यातच गाझीपूर मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केल्यामुळे संघर्षाची ठिणगी उडाली. तुम्हाला आम्हाला अटक करण्याची आवड असल्यास अटक करा. आमदारांशी वैमनस्य असल्यास त्यांना अटक करा; मात्र दिल्लीच्या कामकाजाचा खोळंबा करू नका, दिल्लीच्या जनतेसाठी काम करा हे मोदीजींना सांगण्यासाठी मी गेलो होतो. - मनीष सिसोदिया, उपमुख्यमंत्री, दिल्लीदिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीला जनादेश दिला आहे, मात्र केजरीवाल हे नाटकांमध्ये गुंतले आहेत. आपच्या आमदारांनी काढलेला मार्च म्हणजे ड्रामा होता. - किरण रिजिजू,केंद्रीय गृह राज्यमंत्री