शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मिझोराममध्ये ‘रेमल’ने वाताहत; दगडखाण ढासळल्याने १३ मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 07:53 IST

अतिवृष्टी व भूस्खलनामुळे एकूण २२ ठार

आयझॉल : मिझोराममध्ये मंगळवारी ‘रेमल’ चक्रीवादळानंतर अतिवृष्टी व भूस्खलनामुळे किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यात आयझॉल जिल्ह्यात दगडखाण ढासळून दोन अल्पवयीन मुलांसह किमान १३ जण ठार झाले, तर आठ जण बेपत्ता झाल्याचे मिझोराम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  सांगितले.

आयझॉलच्या मेल्थम व हॅलिमेन भागात सकाळी सहाच्या सुमारास दगडखाण ढासळली. भूस्खलनामुळे अनेक घरे व कामगार छावण्यांना फटका बसला. त्याखाली किमान २१ लोक गाडल्या गेले. त्यातील १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मृतांत एका चार वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेत झालेल्याजीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

आसाम, मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत 

आसाममध्ये मुसळधार पावसाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर १७ जखमी झाले. लखीमपूरमध्ये निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पात झालेल्या भूस्खलनात एकाचा, तर मोरीगावमध्ये रिक्षावर झाड पडल्याने १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

मणिपूरच्या अनेक भागांत मंगळवारी संततधार मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील आंद्रो पार्किंग, चेकॉन, महाबली आणि वांगखेई येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाले. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळmizoram-pcमिजोरम