शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

मिझोराममध्ये ‘रेमल’ने वाताहत; दगडखाण ढासळल्याने १३ मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 07:53 IST

अतिवृष्टी व भूस्खलनामुळे एकूण २२ ठार

आयझॉल : मिझोराममध्ये मंगळवारी ‘रेमल’ चक्रीवादळानंतर अतिवृष्टी व भूस्खलनामुळे किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यात आयझॉल जिल्ह्यात दगडखाण ढासळून दोन अल्पवयीन मुलांसह किमान १३ जण ठार झाले, तर आठ जण बेपत्ता झाल्याचे मिझोराम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  सांगितले.

आयझॉलच्या मेल्थम व हॅलिमेन भागात सकाळी सहाच्या सुमारास दगडखाण ढासळली. भूस्खलनामुळे अनेक घरे व कामगार छावण्यांना फटका बसला. त्याखाली किमान २१ लोक गाडल्या गेले. त्यातील १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मृतांत एका चार वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेत झालेल्याजीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

आसाम, मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत 

आसाममध्ये मुसळधार पावसाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर १७ जखमी झाले. लखीमपूरमध्ये निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पात झालेल्या भूस्खलनात एकाचा, तर मोरीगावमध्ये रिक्षावर झाड पडल्याने १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

मणिपूरच्या अनेक भागांत मंगळवारी संततधार मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील आंद्रो पार्किंग, चेकॉन, महाबली आणि वांगखेई येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाले. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळmizoram-pcमिजोरम