शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

मिझो आदिवासींची १८ वर्षांनी ‘घर वापसी’

By admin | Updated: May 18, 2015 23:58 IST

त्रिपुरात निर्वासितांचे जीणे जगत असलेल्या हजारो आदिवासींना पुन्हा राज्यात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यास मिझोेराम सरकार अखेर तयार झाले आहे.

आगरतळा/ ऐझॉल : एका मिझो वन अधिकाऱ्याच्या हत्येवरून उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर घरदार सोडून परागंदा झालेल्या आणि त्रिपुरात निर्वासितांचे जीणे जगत असलेल्या हजारो आदिवासींना पुन्हा राज्यात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यास मिझोेराम सरकार अखेर तयार झाले आहे.त्रिपिराचे मदत आणि पुनर्वसनमंत्री बादल चौधरी यांच्यानुसार मिझोरामच्या आदिवासींची ५,२८६ कुटुंबे मिझोरामला लागून असलेल्या उत्तर त्रिपुरा जिल्ह्याच्या कांचनपूर आणि पनीसागर उपविभागांतील सात निवार्सित छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यांत ३१,२२३ पुरुष, महिला व मुलांचा समावेश आहे. हे आदिवासी रिआंग जमातीचे असून ते स्वत:ला ‘ब्रु’ म्हणवितात.पनिसागरचे उपविभागीय दंडाधिकारी बिल्पव दास यांनी सांगितले की, त्रिपुरा व मिझोराम सरकारचे अधिकारी आणि या आदिवासींच्या मिझोराम ब्रु विस्थापित फोरमचे नेते यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत या आदिवासींना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे ठरविण्यात आले. मिझोराम सरकारने या बहुतांश लोकांना परत आपल्या राज्यात घेण्याचे मान्य केले आहे, असे दास म्हणाले. याआधी त्रिपुरातील निवार्सित छावण्यांमध्ये राहणारे सर्वजण आमच्या राज्यातील नाग्हीत, असे म्हणून मिझोराम सरकारने सर्वांना परत घेण्यास नकार दिला होता.(वृत्तसंस्था)४सुप्रीम कोर्टाचे निर्देश व केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मध्यस्थीने दोन्ही राज्यांतील बैठकीत उत्तर त्रिपुरातील सर्व आदिवासींचे पुनप्रत्यार्पण करण्याचा प्रस्ताव होता. ४या पुनर्वसनासाठी आधी त्रिपुराने केंद्राकडे ७० कोटींच्या मदतीची मागणी केली होती. गृह मंत्रालयाने अलीकडेच यासाठी ४.७ कोटी रुपये दिले आहेत. पण ती रक्कम पुरेशी नाही.४गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी १४ फेब्रुवारी रोजी निर्वासित छावण्यांना भेट देऊन त्यांनी प. मिझोराममधील आपल्या मूळगावांत परत जावे, असा या आदिवासींना आग्रह केला होता.