शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

मिस्त्रींचा पलटवार!

By admin | Updated: October 27, 2016 07:38 IST

देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच त्यांचे पूर्वसुरी व आताचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांच्यावर पलटवार करत, टाटा यांच्या अनाठायी लुडबुडीमुळे आपली अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती, असा गंभीर आरोप केला आहे.सोमवारी चेअरमन पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गप्प राहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, २५ आॅक्टोबर रोजी, टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना, रात्री १० वाजता ई-मेलने पाठविलेले पाचपानी गोपनीय पत्र बुधवारी विविध माध्यमांतून उघड झाले. या पत्राची भाषा पाहता, मिस्त्री यांनी केवळ आपली बाजू मांडण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य न्यायालयीन लढ्याची भक्कम पृष्ठभूमी तयार करण्यासाठी हे पत्र मातब्बर वकिलांचा सल्ला घेऊन लिहिले असावे, असे मानले जात आहे.मिस्त्री पत्रात म्हणतात की, सन २०११ मध्ये चेअरमनपदासाठी शोध घेऊनही कोणी लायक उमेदवार न मिळाल्याने रतन टाटा व लॉर्ड भट्टाचार्य यांनी आपल्याला हे पद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीस माझी तयारी नव्हती. परंतु नंतर टाटा समुहाच्या व्यापक हितासाठी मी तयार झालो.ते पत्रात पुढे लिहितात, मला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन नियुक्तीपूर्वी देण्यात आले होते. आधीचे चेअरमन (रतन टाटा) बाजूला होणार होते व गरज पडेल तेव्हा सल्ला व मार्गदर्शनासाठी उपलब्ध होणार होते. माझ्या नियुक्तीनंतर कंपनीच्या ‘आर्टिकल्स आॅफ असोसिएशन’मध्ये बदल केले गेले. त्यामुळे टाटा ट्रस्ट््स, टाटा सन्सचे संचालक मंडळ व चेअरमन आणि समुहातील कंपन्या यांच्यातील परस्पर संबंधांचे गणित पार बदलून गेले. त्यानंतर या बदललेल्या नियमांचे चुकीचे अर्थ लावले गेले. परिणामी प्राप्त वित्तीय स्थितीतून बाहेर पडण्यासाठी समुहाने करायच्या प्रयत्नांवर मर्यादा आल्या.याच अनुषंगाने पत्राच्या शेवटी संचालकांना उद्देशून मिस्त्री म्हणतात की, नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता. समुहाच्या भावी वाटचालीसाठी परिणामकारक अशा प्रशासन व्यवस्थेची रचना करणयाची माझी इच्छा होती. ते करीत असताना मी कंपनीचे हितच प्रामाणिकपणे जपले. तडकाफडकी पदावरून दूर केल्याने घोर निराशा झाली नाही, असे म्हणून मी खोटे बोलणार नाही. पण आता ज्या परिणामास सामोरे जावे लागत आहे त्याची तमा न बाळगता मी स्वाभिमान आणि प्रतिष्ठा कायम ठेवून माझ्या परीने सर्व प्रयत्न केले.(विशेष प्रतिनिधी)मिस्त्री पत्रात म्हणतात की, ‘असमाधानकारक कामगिरीमुळे मला दूर करण्यात आले, यावर माझा विश्वास नाही. विजय सिंग, फरिदा खंबाटा आणि रोनेन सेन या त्रयस्थ संचालकांचा समावेश असलेल्या ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ने अलीकडेच माझ्या कामाचे कौतुक केले होते. (आणि) आता याच तीनपैकी दोन संचालकांनी मला दूर करण्याच्या बाजूने मत दिले आहे.’बैठक थांबवून टाटांचा सल्लाकंपनीवर नेमलेल्या त्रयस्थ संचालकांनी आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीने काम करून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे, असे मी गृहीत धरतो, पण या संचालकांची अवस्था निव्वळ पोस्टमनसारखी झाली होती. उदा. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची एक बैठक सुरू असताना, ट्रस्टने नेमलेले संचालक नितीन नोहरिया व विजय सिंग, इतरांना तासभर ताटकळत ठेवून, रतन टाटा यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी बैठकीतून उठून गेले होते.माझी अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती...मला पदावरून दूर करण्याचा निर्णय झालेल्या २४ आॅक्टोबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जे काही झाले, ते सर्व अवैध आणि बेकायदा असल्याने मला जो धक्का बसला. त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. अशा प्रकारे निर्णय घेणे संचालक मंडळास शोभणारे नाही.एका शब्दाचीही कारणमीमांसा न देता किंवा बचावाची अजिबात संधी न देता, चेअरमनला अशा प्रकारे बदलले जाणे हे कॉर्पोरेट इतिहासात न भुतो असेच असावे. हा निर्णय अशा तडकाफडकी घेतला जाणे व असे का केले, याचा कोणताही खुलासा न करणे, यामुळे ज्या नानाविध शंकाकुशंका वर्तविल्या जात आहेत, त्याने टाटा उद्योग समूहाच्या प्रतिष्ठेची अपरिमित हानी झाली आहे.नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता.मोदी यांना भेटण्याची इच्छा : सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त असून, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.