शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

मिस्त्रींचा पलटवार!

By admin | Updated: October 27, 2016 07:38 IST

देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच त्यांचे पूर्वसुरी व आताचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांच्यावर पलटवार करत, टाटा यांच्या अनाठायी लुडबुडीमुळे आपली अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती, असा गंभीर आरोप केला आहे.सोमवारी चेअरमन पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गप्प राहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, २५ आॅक्टोबर रोजी, टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना, रात्री १० वाजता ई-मेलने पाठविलेले पाचपानी गोपनीय पत्र बुधवारी विविध माध्यमांतून उघड झाले. या पत्राची भाषा पाहता, मिस्त्री यांनी केवळ आपली बाजू मांडण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य न्यायालयीन लढ्याची भक्कम पृष्ठभूमी तयार करण्यासाठी हे पत्र मातब्बर वकिलांचा सल्ला घेऊन लिहिले असावे, असे मानले जात आहे.मिस्त्री पत्रात म्हणतात की, सन २०११ मध्ये चेअरमनपदासाठी शोध घेऊनही कोणी लायक उमेदवार न मिळाल्याने रतन टाटा व लॉर्ड भट्टाचार्य यांनी आपल्याला हे पद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीस माझी तयारी नव्हती. परंतु नंतर टाटा समुहाच्या व्यापक हितासाठी मी तयार झालो.ते पत्रात पुढे लिहितात, मला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन नियुक्तीपूर्वी देण्यात आले होते. आधीचे चेअरमन (रतन टाटा) बाजूला होणार होते व गरज पडेल तेव्हा सल्ला व मार्गदर्शनासाठी उपलब्ध होणार होते. माझ्या नियुक्तीनंतर कंपनीच्या ‘आर्टिकल्स आॅफ असोसिएशन’मध्ये बदल केले गेले. त्यामुळे टाटा ट्रस्ट््स, टाटा सन्सचे संचालक मंडळ व चेअरमन आणि समुहातील कंपन्या यांच्यातील परस्पर संबंधांचे गणित पार बदलून गेले. त्यानंतर या बदललेल्या नियमांचे चुकीचे अर्थ लावले गेले. परिणामी प्राप्त वित्तीय स्थितीतून बाहेर पडण्यासाठी समुहाने करायच्या प्रयत्नांवर मर्यादा आल्या.याच अनुषंगाने पत्राच्या शेवटी संचालकांना उद्देशून मिस्त्री म्हणतात की, नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता. समुहाच्या भावी वाटचालीसाठी परिणामकारक अशा प्रशासन व्यवस्थेची रचना करणयाची माझी इच्छा होती. ते करीत असताना मी कंपनीचे हितच प्रामाणिकपणे जपले. तडकाफडकी पदावरून दूर केल्याने घोर निराशा झाली नाही, असे म्हणून मी खोटे बोलणार नाही. पण आता ज्या परिणामास सामोरे जावे लागत आहे त्याची तमा न बाळगता मी स्वाभिमान आणि प्रतिष्ठा कायम ठेवून माझ्या परीने सर्व प्रयत्न केले.(विशेष प्रतिनिधी)मिस्त्री पत्रात म्हणतात की, ‘असमाधानकारक कामगिरीमुळे मला दूर करण्यात आले, यावर माझा विश्वास नाही. विजय सिंग, फरिदा खंबाटा आणि रोनेन सेन या त्रयस्थ संचालकांचा समावेश असलेल्या ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ने अलीकडेच माझ्या कामाचे कौतुक केले होते. (आणि) आता याच तीनपैकी दोन संचालकांनी मला दूर करण्याच्या बाजूने मत दिले आहे.’बैठक थांबवून टाटांचा सल्लाकंपनीवर नेमलेल्या त्रयस्थ संचालकांनी आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीने काम करून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे, असे मी गृहीत धरतो, पण या संचालकांची अवस्था निव्वळ पोस्टमनसारखी झाली होती. उदा. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची एक बैठक सुरू असताना, ट्रस्टने नेमलेले संचालक नितीन नोहरिया व विजय सिंग, इतरांना तासभर ताटकळत ठेवून, रतन टाटा यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी बैठकीतून उठून गेले होते.माझी अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती...मला पदावरून दूर करण्याचा निर्णय झालेल्या २४ आॅक्टोबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जे काही झाले, ते सर्व अवैध आणि बेकायदा असल्याने मला जो धक्का बसला. त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. अशा प्रकारे निर्णय घेणे संचालक मंडळास शोभणारे नाही.एका शब्दाचीही कारणमीमांसा न देता किंवा बचावाची अजिबात संधी न देता, चेअरमनला अशा प्रकारे बदलले जाणे हे कॉर्पोरेट इतिहासात न भुतो असेच असावे. हा निर्णय अशा तडकाफडकी घेतला जाणे व असे का केले, याचा कोणताही खुलासा न करणे, यामुळे ज्या नानाविध शंकाकुशंका वर्तविल्या जात आहेत, त्याने टाटा उद्योग समूहाच्या प्रतिष्ठेची अपरिमित हानी झाली आहे.नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता.मोदी यांना भेटण्याची इच्छा : सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त असून, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.