शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

मिस्त्रींचा पलटवार!

By admin | Updated: October 27, 2016 07:38 IST

देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच त्यांचे पूर्वसुरी व आताचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांच्यावर पलटवार करत, टाटा यांच्या अनाठायी लुडबुडीमुळे आपली अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती, असा गंभीर आरोप केला आहे.सोमवारी चेअरमन पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गप्प राहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, २५ आॅक्टोबर रोजी, टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना, रात्री १० वाजता ई-मेलने पाठविलेले पाचपानी गोपनीय पत्र बुधवारी विविध माध्यमांतून उघड झाले. या पत्राची भाषा पाहता, मिस्त्री यांनी केवळ आपली बाजू मांडण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य न्यायालयीन लढ्याची भक्कम पृष्ठभूमी तयार करण्यासाठी हे पत्र मातब्बर वकिलांचा सल्ला घेऊन लिहिले असावे, असे मानले जात आहे.मिस्त्री पत्रात म्हणतात की, सन २०११ मध्ये चेअरमनपदासाठी शोध घेऊनही कोणी लायक उमेदवार न मिळाल्याने रतन टाटा व लॉर्ड भट्टाचार्य यांनी आपल्याला हे पद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीस माझी तयारी नव्हती. परंतु नंतर टाटा समुहाच्या व्यापक हितासाठी मी तयार झालो.ते पत्रात पुढे लिहितात, मला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन नियुक्तीपूर्वी देण्यात आले होते. आधीचे चेअरमन (रतन टाटा) बाजूला होणार होते व गरज पडेल तेव्हा सल्ला व मार्गदर्शनासाठी उपलब्ध होणार होते. माझ्या नियुक्तीनंतर कंपनीच्या ‘आर्टिकल्स आॅफ असोसिएशन’मध्ये बदल केले गेले. त्यामुळे टाटा ट्रस्ट््स, टाटा सन्सचे संचालक मंडळ व चेअरमन आणि समुहातील कंपन्या यांच्यातील परस्पर संबंधांचे गणित पार बदलून गेले. त्यानंतर या बदललेल्या नियमांचे चुकीचे अर्थ लावले गेले. परिणामी प्राप्त वित्तीय स्थितीतून बाहेर पडण्यासाठी समुहाने करायच्या प्रयत्नांवर मर्यादा आल्या.याच अनुषंगाने पत्राच्या शेवटी संचालकांना उद्देशून मिस्त्री म्हणतात की, नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता. समुहाच्या भावी वाटचालीसाठी परिणामकारक अशा प्रशासन व्यवस्थेची रचना करणयाची माझी इच्छा होती. ते करीत असताना मी कंपनीचे हितच प्रामाणिकपणे जपले. तडकाफडकी पदावरून दूर केल्याने घोर निराशा झाली नाही, असे म्हणून मी खोटे बोलणार नाही. पण आता ज्या परिणामास सामोरे जावे लागत आहे त्याची तमा न बाळगता मी स्वाभिमान आणि प्रतिष्ठा कायम ठेवून माझ्या परीने सर्व प्रयत्न केले.(विशेष प्रतिनिधी)मिस्त्री पत्रात म्हणतात की, ‘असमाधानकारक कामगिरीमुळे मला दूर करण्यात आले, यावर माझा विश्वास नाही. विजय सिंग, फरिदा खंबाटा आणि रोनेन सेन या त्रयस्थ संचालकांचा समावेश असलेल्या ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ने अलीकडेच माझ्या कामाचे कौतुक केले होते. (आणि) आता याच तीनपैकी दोन संचालकांनी मला दूर करण्याच्या बाजूने मत दिले आहे.’बैठक थांबवून टाटांचा सल्लाकंपनीवर नेमलेल्या त्रयस्थ संचालकांनी आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीने काम करून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे, असे मी गृहीत धरतो, पण या संचालकांची अवस्था निव्वळ पोस्टमनसारखी झाली होती. उदा. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची एक बैठक सुरू असताना, ट्रस्टने नेमलेले संचालक नितीन नोहरिया व विजय सिंग, इतरांना तासभर ताटकळत ठेवून, रतन टाटा यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी बैठकीतून उठून गेले होते.माझी अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती...मला पदावरून दूर करण्याचा निर्णय झालेल्या २४ आॅक्टोबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जे काही झाले, ते सर्व अवैध आणि बेकायदा असल्याने मला जो धक्का बसला. त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. अशा प्रकारे निर्णय घेणे संचालक मंडळास शोभणारे नाही.एका शब्दाचीही कारणमीमांसा न देता किंवा बचावाची अजिबात संधी न देता, चेअरमनला अशा प्रकारे बदलले जाणे हे कॉर्पोरेट इतिहासात न भुतो असेच असावे. हा निर्णय अशा तडकाफडकी घेतला जाणे व असे का केले, याचा कोणताही खुलासा न करणे, यामुळे ज्या नानाविध शंकाकुशंका वर्तविल्या जात आहेत, त्याने टाटा उद्योग समूहाच्या प्रतिष्ठेची अपरिमित हानी झाली आहे.नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता.मोदी यांना भेटण्याची इच्छा : सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त असून, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.