अमिताभ श्रीवास्तव - ताज्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या यशाचे गुणगान करण्यात गुंतलेली भारतीय जनता पार्टी कितीही खरे-खोटे दावे करो पण त्यांचे यश चमत्कार असले तरी असे पहिल्यांदा घडलेले नाही़ आघाडी सरकारच्या कार्यकाळात बहुमत मिळवून भाजपाने एक चमत्कार केला़ पण हा चमत्कार पहिल्यांदा झालेला नाही, हे वास्तव आहे़ देशात आतापर्यंतच्या १६ लोकसभा निवडणुकीपैकी ७ निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे़ सन १९५२पासून १९७१पर्यंत सलग पाचदा काँगे्रस स्वबळावर सत्तेत आली़ त्यानंतर १९८० आणि १९८४मध्येही काँग्रेसने स्वबळावर सत्ता संपादन केली़ सन १९८४मध्ये काँग्रेसने विक्रमी ४०४ जागा मिळवल्या़ याउलट १९६७ च्या चौथ्या लोकसभेत सर्वाधिक कमी २८३ जागांसह सत्ता मिळवली़ तरीही काँग्रेसच्या वाट्याला ४०़७८ टक्के मते आली होती़ १९८४ मध्ये काँग्रेसने ४९़१० टक्के मतांसह सर्वाधिक मताधिक्य मिळवले़ निवडणूक इतिहासातील हा एक विक्रम होता़ दुसरीकडे विरोधी पक्ष रूपात पहिल्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीजवळ (भाकपा) १६, दुसर्या निवडणुकीत २७ आणि तिसर्या निवडणुकीत २९ जागा होत्या़ याशिवाय १९६७ मध्ये स्वतंत्र पार्टीकडे ४४ जागा, १९८० मध्ये जनता पार्टी(सेक्युलर) जवळ ४१ जागा होत्या़ भारतीय जनता पार्टीचा विचार करता, या पक्षाने स्थापनेनंतरच्या १९८४च्या आपल्या पहिल्या निवडणुकीत २२४ जागा लढवून केवळ दोन जागा जिंकल्या होत्या़ मतांच्या दृष्टीनेही विरोधी पक्ष रूपात कुठल्याही पक्षाला दोन अंकी टक्केवारीत मते मिळवता आली नव्हती़ काँग्रेस मात्र ४४ जागा जिंकण्याच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक खराब प्रदर्शनानंतरही १९़३ टक्के मतांसह विरोधकांमध्ये बसणार आहे़
चमत्कार, पण पहिल्यांदा नाही
By admin | Updated: May 26, 2014 03:13 IST