शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

चमत्कार, पण पहिल्यांदा नाही

By admin | Updated: May 26, 2014 03:13 IST

ताज्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या यशाचे गुणगान करण्यात गुंतलेली भारतीय जनता पार्टी कितीही खरे-खोटे दावे करो पण त्यांचे यश चमत्कार असले तरी असे पहिल्यांदा घडलेले नाही़

अमिताभ श्रीवास्तव -  ताज्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या यशाचे गुणगान करण्यात गुंतलेली भारतीय जनता पार्टी कितीही खरे-खोटे दावे करो पण त्यांचे यश चमत्कार असले तरी असे पहिल्यांदा घडलेले नाही़ आघाडी सरकारच्या कार्यकाळात बहुमत मिळवून भाजपाने एक चमत्कार केला़ पण हा चमत्कार पहिल्यांदा झालेला नाही, हे वास्तव आहे़ देशात आतापर्यंतच्या १६ लोकसभा निवडणुकीपैकी ७ निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे़ सन १९५२पासून १९७१पर्यंत सलग पाचदा काँगे्रस स्वबळावर सत्तेत आली़ त्यानंतर १९८० आणि १९८४मध्येही काँग्रेसने स्वबळावर सत्ता संपादन केली़ सन १९८४मध्ये काँग्रेसने विक्रमी ४०४ जागा मिळवल्या़ याउलट १९६७ च्या चौथ्या लोकसभेत सर्वाधिक कमी २८३ जागांसह सत्ता मिळवली़ तरीही काँग्रेसच्या वाट्याला ४०़७८ टक्के मते आली होती़ १९८४ मध्ये काँग्रेसने ४९़१० टक्के मतांसह सर्वाधिक मताधिक्य मिळवले़ निवडणूक इतिहासातील हा एक विक्रम होता़ दुसरीकडे विरोधी पक्ष रूपात पहिल्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीजवळ (भाकपा) १६, दुसर्‍या निवडणुकीत २७ आणि तिसर्‍या निवडणुकीत २९ जागा होत्या़ याशिवाय १९६७ मध्ये स्वतंत्र पार्टीकडे ४४ जागा, १९८० मध्ये जनता पार्टी(सेक्युलर) जवळ ४१ जागा होत्या़ भारतीय जनता पार्टीचा विचार करता, या पक्षाने स्थापनेनंतरच्या १९८४च्या आपल्या पहिल्या निवडणुकीत २२४ जागा लढवून केवळ दोन जागा जिंकल्या होत्या़ मतांच्या दृष्टीनेही विरोधी पक्ष रूपात कुठल्याही पक्षाला दोन अंकी टक्केवारीत मते मिळवता आली नव्हती़ काँग्रेस मात्र ४४ जागा जिंकण्याच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक खराब प्रदर्शनानंतरही १९़३ टक्के मतांसह विरोधकांमध्ये बसणार आहे़