शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर्स हटवण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आदेश

By admin | Updated: April 15, 2016 13:35 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरणा-या स्पीड ब्रेकरला राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पीड ब्रेकर्स राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे. 
वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि सीमा रस्ते संघटनेला (बीआरओ) हे आदेश दिले आहेत.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व विभागांना बुधवारपर्यंत आपल्या कामकाजाची माहिती देण्यास सांगितलं आहे. रस्ते अपघातासंबंधी मंत्रालयाने 2014 मध्ये अहवाल दिला होता.  अहवालानुसार 4726 लोकांनी रंगीत पट्ट्यांमुळे (हंप्स) झालेल्या अपघातात आपला जीव गमावला आहे. तर 6672 लोकांचा खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मार्गदर्शक तत्वे जारी केलेली असतानाही वाहनांचा वेग कमी कऱण्यासाठी स्पीड ब्रेकर बांधले जात असल्याचं म्हटलं आहे. यावर मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित असतं. स्पीड ब्रेकरमुळे गंभीर अडथळा होऊन वेगाने जाणा-या वाहनांचा अपघात होऊ शकतो असं मत मंत्रालयाने व्यक्त केलं आहे. 
 
आंतरराष्ट्रीय रस्ते फेडरेशनचे चेअरमन कपिला यांनी हायवेवर स्पीड ब्रेकर नसावेत याचं समर्थन केलं आहे. पण काही हायवे गावातून जातात जिथे लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचंही कपिला बोलले आहेत.