शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर्स हटवण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आदेश

By admin | Updated: April 15, 2016 13:35 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरणा-या स्पीड ब्रेकरला राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पीड ब्रेकर्स राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे. 
वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि सीमा रस्ते संघटनेला (बीआरओ) हे आदेश दिले आहेत.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व विभागांना बुधवारपर्यंत आपल्या कामकाजाची माहिती देण्यास सांगितलं आहे. रस्ते अपघातासंबंधी मंत्रालयाने 2014 मध्ये अहवाल दिला होता.  अहवालानुसार 4726 लोकांनी रंगीत पट्ट्यांमुळे (हंप्स) झालेल्या अपघातात आपला जीव गमावला आहे. तर 6672 लोकांचा खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मार्गदर्शक तत्वे जारी केलेली असतानाही वाहनांचा वेग कमी कऱण्यासाठी स्पीड ब्रेकर बांधले जात असल्याचं म्हटलं आहे. यावर मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित असतं. स्पीड ब्रेकरमुळे गंभीर अडथळा होऊन वेगाने जाणा-या वाहनांचा अपघात होऊ शकतो असं मत मंत्रालयाने व्यक्त केलं आहे. 
 
आंतरराष्ट्रीय रस्ते फेडरेशनचे चेअरमन कपिला यांनी हायवेवर स्पीड ब्रेकर नसावेत याचं समर्थन केलं आहे. पण काही हायवे गावातून जातात जिथे लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचंही कपिला बोलले आहेत.