शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बिहार निवडणुकीत एमआयएमची उडी

By admin | Updated: September 13, 2015 02:09 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराची महाआघाडी आणि भाजपाप्रणीत रालोआत जोरदार मुकाबला सुरू असतानाच आता खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या आॅल

हैदराबाद : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराची महाआघाडी आणि भाजपाप्रणीत रालोआत जोरदार मुकाबला सुरू असतानाच आता खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या आॅल इंडिया-मजलीस- ए-इत्तेहदुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) सुद्धा या रणसंग्रामात उडी घेतली आहे. परंतु पक्ष नेमक्या किती जागांवर उमेदवार उभे करणार याचा खुलासा मात्र केला नाही. सीमांचलमध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा ओवेसी यांनी शनिवारी केली. सीमांचलमध्ये विधानसभेच्या एकूण २३ जागा आहेत. इतर पक्षांसोबत निवडणूकपूर्व समझोत्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ओवेसी यांनी नकारात्मक उत्तर दिले. एमआयएमच्या या निर्णयाने काँग्रेस, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीस निवडणुकीत मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एमआयएममुळे मुस्लीम मतांची विभागणी आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्यास भारतीय जनता पार्टीला याचा लाभ होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. एमआयएमने पक्षाच्या बिहार शाखेच्या अध्यक्षपदी अख्तर इमाम यांची नियुक्ती केली आहे. (वृत्तसंस्था) बिहारमध्ये एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के मुस्लीम आहेत. सीमांचलच्या किशनगंजसारख्या मतदारसंघांमध्ये ७० टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. काही मतदारसंघांमध्ये ती २५ ते ४० टक्के एवढी आहे. त्यामुळे सीमांचलमधील २३ जागांवर तिरंगी लढतीची शक्यता आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने अरारिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार हे जिल्हे येतात. एमआयएममुळे मतांची विभागणी होईल हा आरोप निराधार आहे. मुळात तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे.- असदुद्दिन ओवेसी, एमआयएमचे नेते