शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

नोटाबंदीमुळे लक्षावधी रोजगार नष्ट

By admin | Updated: February 10, 2017 01:18 IST

यंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वांनाच निराशेच्या गर्तेत लोटले आहे. अर्थव्यवस्थेत ना दूरगामी बदल घडवण्याची क्षमता अर्थसंकल्पात आहे

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीयंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वांनाच निराशेच्या गर्तेत लोटले आहे. अर्थव्यवस्थेत ना दूरगामी बदल घडवण्याची क्षमता अर्थसंकल्पात आहे ना गरीबांविषयी साहानुभूती. नोटाबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या मुळावरच उठला आहे. हा २0१६ वर्षातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी राज्यसभेत केले. अर्थसंकल्पावर ते बोलत असताना सभागृह एकाग्र चित्ताने भाषण ऐकत होते. नोटाबंदी, बेरोजगारी, उध्वस्त होत असलेले छोटे व्यापार, उद्योग, शेती व्यवसायाची दैना, कॅशलेस व्यवहारांबाबत चाललेला आग्रह, अशा अनेक मुद्द्यांच्या, तर्कशुद्ध पद्धतीने चिंध्या करीत बजेटमधील बहुतांश दावे त्यांनी खोडून काढले.चिदंबरम म्हणाले, काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा व दहशतवादी कृ त्यांना मिळणारा निधी खणून काढण्यासाठी हा निर्णय घेतला, असे सरकारने सांगितले. पण यापैकी एकही उद्देश साध्य झाला नाही. साऱ्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या. केवळ भूतान, नेपाळ, बांगला देश व प्रवासी भारतीयांकडे असलेल्या नोटा जमा होऊ शकल्या नाहीत, याचे कारण सरकारने त्यांचा विश्वासघात केला आहे. नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत. नॅशनल सँपल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार १५ कोटी लोक शेती, बांधकाम इत्यादी क्षेत्रांत रोजंदारीवरील मजूर आहेत. २५.५ कोटी लोक हातगाडीवर भाजीपाल्यासह विविध वस्तू विकणारे,प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, सुतार, चर्मकार, लोहार, अशा स्वयंरोजगाराच्या कमाईतून उपजिविका भागवतात. नोटाबंदीने या ४0 कोटी लोकांचे दैनंदिन जगणेच उध्वस्त केले. कदाचित कालांतराने हे लोक सरकारला क्षमा करतील. मात्र हा विदारक अनुभव ते जन्मभर विसरणार नाहीत.यूपीए सरकारने दरवर्षी पिकांचा हमीभाव वाढवला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात किमान हमीभावाचा उल्लेखच नाही. त्याऐवजी पीक विमा योजनेचे कौतुक चालवले आहे. नैसर्गिक कारणाने पिकाचे नुकसान झाले तरच शेतकऱ्याला हा विमा मिळणार आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नाही.दरवर्षी २ कोटी नोकऱ्या व रोजगार पुरवण्याचे वचन देणाऱ्या केंद्र सरकारमुळे प्रत्यक्षात ३ वर्षांत १५ लाख तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या, असे सांगून चिदम्बरम म्हणाले की, अमेरिका व युरोप खंडातल्या प्रगत देशांनी अनुक्रमे डॉलर्स आणि युरो या चलनी नोटांचे प्रमाण गेल्या काही वर्र्षात दुपटीने वाढवले आहे. रोज अनेक वस्तू व सेवांची खरेदी लोक करतात, की ज्याविषयी त्यांना खाजगीपण हवे असते. हे सारे व्यवहार कॅशलेस झाले तर त्यातील गोपनीयताच नष्ट होईल. वैयक्तिक जीवनाच्या अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या प्रयोगाचा आग्रह कशासाठी? मोदींनी काल माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविषयी जे उद्गार काढले ते पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला न शोभणारे आहेत, असे नमूद करीत ते म्हणाले की मोदींच्या भाषणात व्यत्यय आणून ते आम्ही हाणून पाडू शकलो असतो. मात्र पंतप्रधानपद फार मोठे आहे, पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, वाजपेयी, चंद्रशेखर यांच्यासारख्या महान व्यक्तींनी हे पद भूषवले आहे.या पदाचा अपमान करता कामा नये, याचे पूर्ण भान ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सभात्याग केला. भविष्यात अशा चुका पंतप्रधान सुधारतील अशी आशा आहे.