शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

गोरक्षकांच्या हल्ल्यात दूध व्यावसायिक ठार!

By admin | Updated: April 7, 2017 04:03 IST

दुभती गाय विकत घेतली आणि त्याला कसाई समजून गोरक्षकांनी ठारच मारले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत.

मेवात/नवी दिल्ली : दुधाचा व्यवसाय करणाऱ्या पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्याला कसाई समजून गोरक्षकांनी ठारच मारले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. संसदेतही गुरुवारी हा विषय उपस्थित झाला.जयसिंहपूरमध्ये (नूह तहसील, मेवात) पेहलू खान यांचे घर आहे. ते दुभती म्हैस विकत घेण्यासाठी शुक्रवारी जयपूरला गेले. शनिवारी म्हशीऐवजी दुभती गाय विकत घेतली. माझ्या वडिलांनी घेतलेला हा निर्णय सर्वांत वाईट ठरला व त्याने माझ्या वडिलांचा जीव घेतला, असे त्यांचा मुलगा इर्शाद (२४) याने सांगितले. गोरक्षकांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग आठवर अलवारच्या बेहरोर भागात पेहलू खान यांना इतकी मारहाण केली की त्यात ते मरण पावले. त्या वेळी इर्शाद आणि त्याचा भाऊ आरीफ हे वडिलांसोबत होते. पिकअप ट्रकमध्ये माझे वडील होते. आमच्याच गावातील अझमत हेदेखील त्यांच्यासोबत होते. ट्रकमध्ये दोन गायी व दोन कालवडी होत्या. इर्शाद, मी आणि आणखी एक ग्रामस्थ दुसऱ्या पिकअप ट्रकमध्ये होते व या ट्रकमध्ये तीन गायी व तीन कालवडी होत्या, असे आरीफने सांगितले. गोरक्षकांनी आमची वाहने कशी अडवली, आम्हाला बाहेर कसे खेचले आणि काठ्या व पट्ट्यांनी कसा हल्ला केला याचे वर्णन त्याने केले. पोलीस आले ते २० ते ३० मिनिटांनी.गोरक्षकांनी त्यांच्यावर कत्तलीसाठी गायींची तस्करी केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनीही त्यांच्यावर कत्तलीसाठी जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये खान आणि इतरांकडे गायी विकत घेतल्याची कागदपत्रे वा पावती नव्हती, असे नमूद केले आहे. इर्शादने पावती दाखवून गायी खरेदी केल्याचा दावा केला. या पावतीवर जयपूर महानगरपालिकेचा शिक्का आहे.>राज्यसभेत चिंता; चौकशी करून वस्तुस्थिती मांडण्याचे आदेशया प्रकरणाबद्दल राज्यसभेत गुरुवारी सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सरकारने या घटनेची चौकशी करून वस्तुस्थिती सभागृहात ठेवावी, असे आदेश दिले. विरोधी पक्ष आणि सरकारकडून या घटनेबद्दल परस्परविरोधी विधाने केली शून्य कालावधीत काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी राजस्थानात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे सांगितले. अशाच घटना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये घडल्या असून या राज्यांत भाजपाचीच सत्ता आहे, असेही ते म्हणाले.>त्यांच्याशी सहमत नसलेल्यांना देशात जागा नाहीगोरक्षकांच्या हल्ल्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.त्यांच्याशी सहमत नसलेल्यांना देशात जागा राहिली नाही आणि सरकार जेव्हा स्वत:ची जबाबदारी सोडून देते त्या वेळी मोठ्या शोकांतिका घडतात, असे म्हटले. मोदी हे अशा दृष्टीकोनाचा प्रचार करीत आहेत की तेथे फक्त एकच एक कल्पना अस्तित्वात राहील, अशा शब्दांत गांधी यांनी त्यांच्यावर हल्ला केला.मोदी किंवा संघाशी जे सहमत नाहीत किंवा त्यांचे ऐकत नाहीत त्यांना भारतात स्थान नाही. हाच दृष्टीकोन आहे, असे गांधी संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. राजस्थान सरकार गप्पया हत्येबद्दल राजस्थान सरकारने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्याचे सर्व मंत्री तसेच भाजपाचे मंत्री यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.गोरक्षण अधिभारगोरक्षणासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी राजस्थानमध्ये न्यायालयीन दस्तावेजांखेरीज अन्य दस्तावेजांच्या मुद्रांक शुल्कावर १० टक्के अधिभार लागू करण्यात आला आहे.