शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

गोरक्षकांच्या हल्ल्यात दूध व्यावसायिक ठार!

By admin | Updated: April 7, 2017 04:03 IST

दुभती गाय विकत घेतली आणि त्याला कसाई समजून गोरक्षकांनी ठारच मारले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत.

मेवात/नवी दिल्ली : दुधाचा व्यवसाय करणाऱ्या पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्याला कसाई समजून गोरक्षकांनी ठारच मारले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. संसदेतही गुरुवारी हा विषय उपस्थित झाला.जयसिंहपूरमध्ये (नूह तहसील, मेवात) पेहलू खान यांचे घर आहे. ते दुभती म्हैस विकत घेण्यासाठी शुक्रवारी जयपूरला गेले. शनिवारी म्हशीऐवजी दुभती गाय विकत घेतली. माझ्या वडिलांनी घेतलेला हा निर्णय सर्वांत वाईट ठरला व त्याने माझ्या वडिलांचा जीव घेतला, असे त्यांचा मुलगा इर्शाद (२४) याने सांगितले. गोरक्षकांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग आठवर अलवारच्या बेहरोर भागात पेहलू खान यांना इतकी मारहाण केली की त्यात ते मरण पावले. त्या वेळी इर्शाद आणि त्याचा भाऊ आरीफ हे वडिलांसोबत होते. पिकअप ट्रकमध्ये माझे वडील होते. आमच्याच गावातील अझमत हेदेखील त्यांच्यासोबत होते. ट्रकमध्ये दोन गायी व दोन कालवडी होत्या. इर्शाद, मी आणि आणखी एक ग्रामस्थ दुसऱ्या पिकअप ट्रकमध्ये होते व या ट्रकमध्ये तीन गायी व तीन कालवडी होत्या, असे आरीफने सांगितले. गोरक्षकांनी आमची वाहने कशी अडवली, आम्हाला बाहेर कसे खेचले आणि काठ्या व पट्ट्यांनी कसा हल्ला केला याचे वर्णन त्याने केले. पोलीस आले ते २० ते ३० मिनिटांनी.गोरक्षकांनी त्यांच्यावर कत्तलीसाठी गायींची तस्करी केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनीही त्यांच्यावर कत्तलीसाठी जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये खान आणि इतरांकडे गायी विकत घेतल्याची कागदपत्रे वा पावती नव्हती, असे नमूद केले आहे. इर्शादने पावती दाखवून गायी खरेदी केल्याचा दावा केला. या पावतीवर जयपूर महानगरपालिकेचा शिक्का आहे.>राज्यसभेत चिंता; चौकशी करून वस्तुस्थिती मांडण्याचे आदेशया प्रकरणाबद्दल राज्यसभेत गुरुवारी सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सरकारने या घटनेची चौकशी करून वस्तुस्थिती सभागृहात ठेवावी, असे आदेश दिले. विरोधी पक्ष आणि सरकारकडून या घटनेबद्दल परस्परविरोधी विधाने केली शून्य कालावधीत काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी राजस्थानात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे सांगितले. अशाच घटना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये घडल्या असून या राज्यांत भाजपाचीच सत्ता आहे, असेही ते म्हणाले.>त्यांच्याशी सहमत नसलेल्यांना देशात जागा नाहीगोरक्षकांच्या हल्ल्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.त्यांच्याशी सहमत नसलेल्यांना देशात जागा राहिली नाही आणि सरकार जेव्हा स्वत:ची जबाबदारी सोडून देते त्या वेळी मोठ्या शोकांतिका घडतात, असे म्हटले. मोदी हे अशा दृष्टीकोनाचा प्रचार करीत आहेत की तेथे फक्त एकच एक कल्पना अस्तित्वात राहील, अशा शब्दांत गांधी यांनी त्यांच्यावर हल्ला केला.मोदी किंवा संघाशी जे सहमत नाहीत किंवा त्यांचे ऐकत नाहीत त्यांना भारतात स्थान नाही. हाच दृष्टीकोन आहे, असे गांधी संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. राजस्थान सरकार गप्पया हत्येबद्दल राजस्थान सरकारने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्याचे सर्व मंत्री तसेच भाजपाचे मंत्री यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.गोरक्षण अधिभारगोरक्षणासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी राजस्थानमध्ये न्यायालयीन दस्तावेजांखेरीज अन्य दस्तावेजांच्या मुद्रांक शुल्कावर १० टक्के अधिभार लागू करण्यात आला आहे.