शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

सैन्यदल कमजोर नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:14 IST

आता २०१३सारखी परिस्थिती राहिलेली नाही. भारत पूर्णपणे संरक्षण सिद्ध आहे. आपले सैन्यदले कमजोर नाहीत, अशी ग्वाही संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : आता २०१३सारखी परिस्थिती राहिलेली नाही. भारत पूर्णपणे संरक्षण सिद्ध आहे. आपले सैन्यदले कमजोर नाहीत, अशी ग्वाही संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात पूर्णवेळ संरक्षण मंत्री नाही. मनोहर पर्रिकरांकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली तर ते निष्क्रिय ठरले. सीमेवर खरोखर युध्द झाले तर केवळ १0 दिवस पुरेल इतका दारूगोळा शिल्लक असल्याचे भारताचे महालेखापाल (सीएजी) यांच्या अहवालात म्हंटले आहे. भारताच्या दोन्ही सीमांवर तणाव आहे, अशा स्थितीत भारताची संरक्षण सिध्दता नेमकी कोणत्या अवस्थेत आहे? शून्यप्रहरात हा सवाल काँग्रेसचे आनंद शर्मा आणि रामगोपाल यादव यांनी राज्यसभेत उपस्थित केला.संरक्षण मंत्री अरूण जेटली त्यावर म्हणाले, महालेखापालांच्या ज्या अहवालाचा सभागृहात उल्लेख झाला तो अहवाल २0१३ सालचा आहे. २0१३ च्या अहवालात सीएजीने संरक्षण सिध्दतेबाबत ज्या शंका उपस्थित केल्या त्या विशिष्ठ कालावधीपुरत्या सीमित होत्या. त्यानंतर या संदर्भात आणखी एक अहवाल आला आहे. त्याचीही चर्चा लोकलेखा समितीत होईलच. तथापि सभागृहाला मी आश्वस्थ करू इच्छितो की २0१३ नंतर संरक्षण सिध्दतेची स्थिती बºयापैकी सुधारली आहे. संरक्षण खरेदी व्यवस्थेत व्यापक विकेंद्रीकरण झाले. खरेदी प्रक्रियेचे सुलभीकरण झाले. या सुधारणांमुळे आपल्या तिन्ही सैन्यदलांकडे पुरेशी संरक्षण सिध्दता आजमितीला आहे.राज्यसभेत शून्यप्रहरात समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी कॅग अहवालाचा उल्लेख करीत सरकारच्या संरक्षण सिध्दतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भारताच्या दोन्ही सीमांवर सध्या तणावाची स्थिती आहे. सीएजी (कॅग) च्या अहवालानुसार केवळ १0 दिवस पुरेल इतकाच दारूगोळा सैन्यदलाकडे शिल्लक आहे. बोफोर्स प्रकरणानंतर तमाम अधिकारी इतके भयग्रस्त आहेत की संरक्षण खरेदी व्यवहारांच्या दस्तऐवजांवर स्वाक्षºया करायलाही घाबरतात.काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले, भारताच्या संरक्षण सिध्दतेबाबत कॅग अहवालाची विस्ताराने चर्चा लोकलेखा समितीत होईल, इतके मर्यादीत उत्तर संरक्षण मंत्र्यांकडून अपेक्षित नाही. संरक्षण खरेदी व्यवस्था सोपी आणि सरळ करण्यासाठी सरकारने नेमक्या कोणत्या सुधारणा तीन वर्षात केल्या याचे उत्तर सभागृहाला हवे आहे.भारताने सैन्य माघारी घेणे हाच सोपा उपायसिक्कीम सेक्टरमधील वादग्रस्त डोकलाम भागातून भारताने त्याचे सैन्य जाणीवपूर्वक माघारी घेणे हा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वादावरील सोपा उपाय आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले. सीमेवरील निर्माण झालेली कुंठितावस्था संपवण्याची जबाबदारी भारतावर टाकून वांग यांनी चीनच्या हद्दीत भारताने प्रवेश केल्याचे भारताने कबूल केले, असा दावा केला. डोकलामच्या मुद्यावर प्रथमच चीनच्या वरिष्ठ नेत्याने भाष्य केले आहे.डोकलाम भागात रस्ते बांधण्यास चीनला भारताने थांबवले आहे. चीनने मात्र आम्ही आमच्याच हद्दीत रस्ते बांधत असल्याचा दावा करून भारताने तत्काळ सैन्य मागे घ्यावे अशी मागणी केली. सुषमा स्वराज यांनी संसदेत गुरुवारी बोलताना दोन्ही देशांनी चर्चेसाठी आधी सैन्य माघारी घेऊन शांततापूर्ण उत्तर शोधावे, असे म्हटले होते.