शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

लष्करी छावणीवर हल्ला

By admin | Updated: March 21, 2015 23:57 IST

दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

जम्मू : दहशतवाद्यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर गोळीबार करून पुन्हा एकदा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर देत हल्ल्यात सामील दोन्ही दहशतवाद्यांना यमसदनी धाडून त्यांचा हा डाव उधळला.राज्यात भाजप-पीडीपी सरकारच्या स्थापनेनंतर शांतता नांदेल, अशी आशा असतानाच दहशतवाद्यांनी सतत दोन हल्ले करून आव्हान उभे केले आहे. कठुआ जिल्ह्यात शुक्रवारी आत्मघाती दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात ३ पोलीस शहीद तर एका पोलीस उपअधीक्षकासह ११ जण जखमी झाले होते. सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सकाळी सुमारे ५.४५ वाजता मेशवाडा भागातील लष्करी छावणीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. हल्लेखोर आणि सुरक्षा दलात काही तास ही चकमक चालली. गोळीबार सुरू असताना तेथून जात असलेला एक नागरिक सायकलवरुन पडला आणि जखमी झाला. दरम्यान, मोहीम फत्ते झाली असून दोन्ही हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी दिल्लीत दिली. आज हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कठुआ हल्ल्यातील हल्लेखोरांशी संबंध होता काय, हे आताच सांगणे कठीण असल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. या हल्ल्यात गोळी लागून कुणीही जखमी झालेले नाही. हल्लेखोरांनी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला नाही. ते बाहेरूनच गोळीबार करीत होते आणि लष्करी क्षेत्राबाहेरच त्यांना घेरण्यात आले. खबरदारी म्हणून जम्म्ू-पठाणकोट महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ४जम्मू-काश्मिरात सुरक्षा दलांच्या मोहिमांमुळे दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचले आहे. ते उंचावण्याचा प्रयत्न या हल्ल्यांच्या माध्यमाने करण्यात आला. परंतु जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावला, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.४ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेक नाले आहेत. त्यामुळे अनेकदा या भागात पाळत ठेवणे कठीण होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) देखरेख आहे.