शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

राजकीय इच्छाशक्तीमुळे झाली लष्करी कारवाई

By admin | Updated: September 29, 2016 17:15 IST

सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल.

- शशिकांत पित्रे

भारत काही ना काही ठोस कारवाई पाकिस्तान संदर्भात करेल हे भाकीत मी यापूर्वीच केलेले होते. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे आटोपशीर परंतु नेमकेपणाने केलेली काटेकोर कारवाई. समजा एखादे बोट दुखत असेल तर ते बोटच काढून टाकणे अशा स्वरुपाचा ढोबळ अर्थ त्यामध्ये अभिप्रेत असतो. अतिशय वेगाने कारवाई करून ती संपवणे अशा स्वरुपात हालचाली यात केल्या जात असतात. क्विक स्ट्राईक या स्वरुपात कारवाई केली जाते. आपल्याला अभ्यास करून माहित झालेले जे उद्दिष्ट असते तिथे जाऊन थोडक्यात परत येतात. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी उरीमध्ये घटना घडल्यानंतर संबंधितांना शिक्षा करू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. डिप्लोमॅटीकली खूप पर्याय उपलब्ध होते. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली. सार्कमधून बाहेर पडणे, इंडस वॉटर ट्रीटी संदर्भातील भूमिका हा त्याचाच भाग होता. चीन सोडून अन्य सर्वांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दला आहे. यापूर्वीच आपल्या संरक्षणमंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ, जागा आणि किती प्रमाणात हे आम्ही ठरवू असे स्पष्ट केलेले होते. याचाच अर्थ थेट युद्ध करणार नाही असाही होता. भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले असले तरीही पाकिस्तानकडून लगेच अणुबॉम्बचा वापर होणार नाही. तसा लगेच करण्याचा इतका पाकिस्तान मूर्ख नाही. सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल. प्रसंगानुरुप थेट कारवाई करण्याचे अनेक प्लॅन आपल्या संरक्षणदलाकडे तयार असतातच. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती यापूर्वी कधीही दाखवली गेली नव्हती ती यावेळी दाखवली गेली ही खरोखर चांगली बाब आहे. पाकिस्तानमध्ये मारले गेलेले सर्व दहशतवादी असतील तर पाकिस्तानने ओरडण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही आपण त्यांना यासंबंधातील अनेक पुरावे दिलेले आहेत परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अवघड असते. पाकिस्तानमधील दहशतवादी या घटनेनंतर देशात पुन्हा कुठेतरी हल्ला करण्याची शक्यता आहे परंतु यावेळी ते तितकेसे सोपे असणार नाही. भारताच्या कारवाईनंतर लगेच काही युद्ध होईल अशी शक्यता वाटत नाही कारण या संदर्भातील तणाव टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जातो. एकदम युद्ध होत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचे पाठबळ ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची व जमेची बाजू आहे. भारताला जर युद्ध करायचे असेल तर आपल्याला किमान ६ महिन्यांचा कालावधी तयारीसाठी लागेल परंतु पाकिस्तानने युद्ध लादलेच तर आपण सज्ज आहोत.

(लेखक निवृत्त मेजर जनरल आहेत.)