शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजकीय इच्छाशक्तीमुळे झाली लष्करी कारवाई

By admin | Updated: September 29, 2016 17:15 IST

सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल.

- शशिकांत पित्रे

भारत काही ना काही ठोस कारवाई पाकिस्तान संदर्भात करेल हे भाकीत मी यापूर्वीच केलेले होते. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे आटोपशीर परंतु नेमकेपणाने केलेली काटेकोर कारवाई. समजा एखादे बोट दुखत असेल तर ते बोटच काढून टाकणे अशा स्वरुपाचा ढोबळ अर्थ त्यामध्ये अभिप्रेत असतो. अतिशय वेगाने कारवाई करून ती संपवणे अशा स्वरुपात हालचाली यात केल्या जात असतात. क्विक स्ट्राईक या स्वरुपात कारवाई केली जाते. आपल्याला अभ्यास करून माहित झालेले जे उद्दिष्ट असते तिथे जाऊन थोडक्यात परत येतात. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी उरीमध्ये घटना घडल्यानंतर संबंधितांना शिक्षा करू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. डिप्लोमॅटीकली खूप पर्याय उपलब्ध होते. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली. सार्कमधून बाहेर पडणे, इंडस वॉटर ट्रीटी संदर्भातील भूमिका हा त्याचाच भाग होता. चीन सोडून अन्य सर्वांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दला आहे. यापूर्वीच आपल्या संरक्षणमंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ, जागा आणि किती प्रमाणात हे आम्ही ठरवू असे स्पष्ट केलेले होते. याचाच अर्थ थेट युद्ध करणार नाही असाही होता. भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले असले तरीही पाकिस्तानकडून लगेच अणुबॉम्बचा वापर होणार नाही. तसा लगेच करण्याचा इतका पाकिस्तान मूर्ख नाही. सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल. प्रसंगानुरुप थेट कारवाई करण्याचे अनेक प्लॅन आपल्या संरक्षणदलाकडे तयार असतातच. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती यापूर्वी कधीही दाखवली गेली नव्हती ती यावेळी दाखवली गेली ही खरोखर चांगली बाब आहे. पाकिस्तानमध्ये मारले गेलेले सर्व दहशतवादी असतील तर पाकिस्तानने ओरडण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही आपण त्यांना यासंबंधातील अनेक पुरावे दिलेले आहेत परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अवघड असते. पाकिस्तानमधील दहशतवादी या घटनेनंतर देशात पुन्हा कुठेतरी हल्ला करण्याची शक्यता आहे परंतु यावेळी ते तितकेसे सोपे असणार नाही. भारताच्या कारवाईनंतर लगेच काही युद्ध होईल अशी शक्यता वाटत नाही कारण या संदर्भातील तणाव टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जातो. एकदम युद्ध होत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचे पाठबळ ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची व जमेची बाजू आहे. भारताला जर युद्ध करायचे असेल तर आपल्याला किमान ६ महिन्यांचा कालावधी तयारीसाठी लागेल परंतु पाकिस्तानने युद्ध लादलेच तर आपण सज्ज आहोत.

(लेखक निवृत्त मेजर जनरल आहेत.)