शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

राजकीय इच्छाशक्तीमुळे झाली लष्करी कारवाई

By admin | Updated: September 29, 2016 17:15 IST

सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल.

- शशिकांत पित्रे

भारत काही ना काही ठोस कारवाई पाकिस्तान संदर्भात करेल हे भाकीत मी यापूर्वीच केलेले होते. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे आटोपशीर परंतु नेमकेपणाने केलेली काटेकोर कारवाई. समजा एखादे बोट दुखत असेल तर ते बोटच काढून टाकणे अशा स्वरुपाचा ढोबळ अर्थ त्यामध्ये अभिप्रेत असतो. अतिशय वेगाने कारवाई करून ती संपवणे अशा स्वरुपात हालचाली यात केल्या जात असतात. क्विक स्ट्राईक या स्वरुपात कारवाई केली जाते. आपल्याला अभ्यास करून माहित झालेले जे उद्दिष्ट असते तिथे जाऊन थोडक्यात परत येतात. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. दिनांक १८ सप्टेंबर रोजी उरीमध्ये घटना घडल्यानंतर संबंधितांना शिक्षा करू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. डिप्लोमॅटीकली खूप पर्याय उपलब्ध होते. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली. सार्कमधून बाहेर पडणे, इंडस वॉटर ट्रीटी संदर्भातील भूमिका हा त्याचाच भाग होता. चीन सोडून अन्य सर्वांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दला आहे. यापूर्वीच आपल्या संरक्षणमंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ, जागा आणि किती प्रमाणात हे आम्ही ठरवू असे स्पष्ट केलेले होते. याचाच अर्थ थेट युद्ध करणार नाही असाही होता. भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले असले तरीही पाकिस्तानकडून लगेच अणुबॉम्बचा वापर होणार नाही. तसा लगेच करण्याचा इतका पाकिस्तान मूर्ख नाही. सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल. प्रसंगानुरुप थेट कारवाई करण्याचे अनेक प्लॅन आपल्या संरक्षणदलाकडे तयार असतातच. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती यापूर्वी कधीही दाखवली गेली नव्हती ती यावेळी दाखवली गेली ही खरोखर चांगली बाब आहे. पाकिस्तानमध्ये मारले गेलेले सर्व दहशतवादी असतील तर पाकिस्तानने ओरडण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही आपण त्यांना यासंबंधातील अनेक पुरावे दिलेले आहेत परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अवघड असते. पाकिस्तानमधील दहशतवादी या घटनेनंतर देशात पुन्हा कुठेतरी हल्ला करण्याची शक्यता आहे परंतु यावेळी ते तितकेसे सोपे असणार नाही. भारताच्या कारवाईनंतर लगेच काही युद्ध होईल अशी शक्यता वाटत नाही कारण या संदर्भातील तणाव टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जातो. एकदम युद्ध होत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचे पाठबळ ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची व जमेची बाजू आहे. भारताला जर युद्ध करायचे असेल तर आपल्याला किमान ६ महिन्यांचा कालावधी तयारीसाठी लागेल परंतु पाकिस्तानने युद्ध लादलेच तर आपण सज्ज आहोत.

(लेखक निवृत्त मेजर जनरल आहेत.)