शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

दुष्काळामुळे स्थलांतर वाढले

By admin | Updated: April 27, 2016 02:25 IST

दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे.

नवी दिल्ली : दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे. परंतु उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने मात्र अशा पलायनाचा इन्कार केला आहे.मंगळवारी राज्यसभेत पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यांमधील २८६६२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. दुष्काळ परिस्थिती हाताळण्यासाठी येथील राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीसाठी जलसंकट कृती योजना तयार केली होती. ज्यावर सध्या काम सुरू आहे. १८ एप्रिलपर्यत राज्यातील ३३५१ गावे आणि ५४०२ वस्त्यांमध्ये ४०१२ टँकर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुढेही गरजेनुसार हा पाणीपुरवठा सुरु राहील. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जलसंकट कृती योजना प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. >मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचे स्पष्टीकरणयादव यांनी सांगितले की, मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार बुंदेलखंड क्षेत्रात हातपंपातील रायझर पाईपच्या लांबीत वाढ, सिंगल फेज पॉवर पंप, निष्क्रिय पाईप पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचा विकास, बोअरवेल, नव्या ट्युबवेल आणि टँकरचा वापर करुन पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात बुंदेलखंड क्षेत्रासाठी २०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. याअंतर्गत ५० दुष्काळग्रस्त जिल्ह्णांमध्ये ५७८६ नवे हातपंप, ३५२७ रिबोर उभारणी आणि ४४० टँकर खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय १ लाख ६८ हजार ३७३ हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे.