शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

दुष्काळामुळे स्थलांतर वाढले

By admin | Updated: April 27, 2016 02:25 IST

दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे.

नवी दिल्ली : दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे. परंतु उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने मात्र अशा पलायनाचा इन्कार केला आहे.मंगळवारी राज्यसभेत पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यांमधील २८६६२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. दुष्काळ परिस्थिती हाताळण्यासाठी येथील राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीसाठी जलसंकट कृती योजना तयार केली होती. ज्यावर सध्या काम सुरू आहे. १८ एप्रिलपर्यत राज्यातील ३३५१ गावे आणि ५४०२ वस्त्यांमध्ये ४०१२ टँकर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुढेही गरजेनुसार हा पाणीपुरवठा सुरु राहील. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जलसंकट कृती योजना प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. >मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचे स्पष्टीकरणयादव यांनी सांगितले की, मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार बुंदेलखंड क्षेत्रात हातपंपातील रायझर पाईपच्या लांबीत वाढ, सिंगल फेज पॉवर पंप, निष्क्रिय पाईप पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचा विकास, बोअरवेल, नव्या ट्युबवेल आणि टँकरचा वापर करुन पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात बुंदेलखंड क्षेत्रासाठी २०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. याअंतर्गत ५० दुष्काळग्रस्त जिल्ह्णांमध्ये ५७८६ नवे हातपंप, ३५२७ रिबोर उभारणी आणि ४४० टँकर खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय १ लाख ६८ हजार ३७३ हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे.