शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

म्हादईप्रश्नी कर्नाटक एकाकी

By admin | Updated: September 13, 2015 04:01 IST

म्हादई पाणी तंटाप्रश्नी गोवा आणि महाराष्ट्राची जणू युती झाली आहे. या प्रश्नावर कर्नाटकला या दोन्ही राज्यांनी एकटे पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा व महाराष्ट्रात भाजपाचे आघाडी सरकार,

- सद्गुरू पाटील,  पणजीम्हादई पाणी तंटाप्रश्नी गोवा आणि महाराष्ट्राची जणू युती झाली आहे. या प्रश्नावर कर्नाटकला या दोन्ही राज्यांनी एकटे पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा व महाराष्ट्रात भाजपाचे आघाडी सरकार, तर कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर असल्याने साहजिकच त्यांच्यात सामंजस्य आहे. कर्नाटकमध्ये उगम पावणारी म्हादई नदी गोवा आणि महाराष्ट्रामधून वाहते. या नदीचा बहुतांश भाग गोव्यात आहे. पणजीत याच नदीला मांडवी म्हणून ओळखले जाते. कर्नाटक सरकार धरणे बांधून म्हादई नदीचे पाणी वळवू पाहात आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची योजना कर्नाटकने आखली आहे. तथापि, कर्नाटकने पाणी वळविले तर गोव्यातील मांडवी नदी, येथील कृषी संस्कृती, पाणी पुरवठा प्रकल्प, म्हादईच्या खोऱ्यातील जीवसृष्टी, जैवविविधता हे सारे धोक्यात येईल, अशी भीती म्हादई बचाव अभियानाचे नेते राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली. गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही केरकर यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. म्हादई नदीच्या पाण्यावरून निर्माण झालेला गोवा व कर्नाटकमधील वाद पाणीतंटा लवादासमोर आहे. तेथे युक्तिवाद सुरू असून, हा विषय निर्णायक टप्प्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारलाही या वादात प्रतिवादी करण्यात आले आहे. मात्र आपली बाजू लंगडी पडली असल्याची कल्पना कर्नाटकला आहे. त्यामुळे कर्नाटकने लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज असल्याचा मुद्दा पुढे करून चर्चेद्वारे हा वाद सोडवू या, अशी भूमिका आता तब्बल १० वर्षांनंतर घेतली आहे.लवादासमोर निर्णय नको, तिन्ही राज्यांनी चर्चा करून तोडगा काढावा, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या व तेथील अनेक भाजपा नेत्यांनाही आता वाटते. त्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यात एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेले होते. शक्य असेल तर चर्चेद्वारे तोडगा काढण्यास पंतप्रधानही अनुकूल आहेत, असा कर्नाटकचा दावा आहे. कर्नाटकमधील धारवाड भागातील वकिलांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची गोव्यात भेट घेतली व म्हादईप्रश्नी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले. पार्सेकर यांनी अर्थातच त्यांची मागणी फेटाळली. लवादासमोरच काय तो निवाडा होऊ द्या, असे गोवा आणि महाराष्ट्रालाही वाटते. त्यामुळे कर्नाटक एकाकी पडले आहे. कर्नाटकच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती; पण पार्सेकर यांनी वेळ दिली नाही.