शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी संस्कृतीला निरोप, ईपीआय संस्कृतीला रुजवा

By admin | Updated: May 1, 2017 03:59 IST

काही लोकांच्या मनात रुतून बसलेल्या व्हीआयपी संस्कृतीला काढून टाकून त्याऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट) संस्कृती

नवी दिल्ली : काही लोकांच्या मनात रुतून बसलेल्या व्हीआयपी संस्कृतीला काढून टाकून त्याऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट) संस्कृती रुजविण्यासाठी लाल दिव्यांवर बंदी घातल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. १ मेपासून लाल दिवे वाहनांवरून काढून टाकले जातील.लाल दिवे हे अति महत्त्वाची व्यक्ती संस्कृतीचे जणू प्रतीक बनले होते. त्यामुळे ते दिवे वापरणाऱ्यांच्या मनात इतरांबद्दल तुच्छतेची भावना निर्माण झाली होती. या देशातील सगळे १२५ कोटी लोक हे समान दर्जाचे व महत्त्वाचे आहेत, असे मोदी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात म्हणाले. १ मेपासून लाल दिवे वापरण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्री, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांच्यासह सगळ्या सरकारी वाहनांना लागू आहे.वाहनावर एकदा लाल दिवा लागला की, ते व्हीआयपी संस्कृती प्रतीक बनतो व ती संस्कृती मग ते वापरणाऱ्यांच्या डोक्यात जाते, असे मोदी म्हणाले. डोक्यात गेलेली व्हीआयपी संस्कृती काढण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल पेमेंटस्चा आग्रह धरताना मोदी म्हणाले की, युवकांनी कॅश रिवार्डस् दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा. भारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅपचा (भीम) वापर करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देणाऱ्यांना हे कॅश रिवार्डस् दिले जातात. ही योजना १४ आॅक्टोबरपर्यंत सुरू आहे. जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भीम अ‍ॅप वापरण्यास सांगेल व त्या व्यक्तीने तीन व्यवहार डिजिटल केल्यानंतर त्या प्रत्येक वेळी त्याला दहा रुपये कमावता येतील. मोठी स्वप्ने पूर्ण करता येतीलसरकारच्या ‘नवा भारत’ संकल्पनेत व्हीआयपीऐवजी ईपीआय संस्कृतीला महत्त्व दिले जाईल. १२५ कोटी लोकांच्या शक्तीला ओळखले, तर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतील, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी या उन्हाळी सुट्यांचा उपयोग नवी कौशल्ये शिकण्यासाठी करण्याचे व चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन केले. नवी भाषा शिका किंवा नव्या ठिकाणी जा, अशी त्यांची सूचना होती. मागच्या ‘मन की बात’मध्ये मी अन्न वाया जाऊ न देण्याबद्दल बोललो होतो. त्याला अनेक सूचनांनी लोकांनी प्रतिसाद दिला, असे मोदी यांनी सांगितले. हवामान बदलाचा प्रश्न आणि वाढता उन्हाळा याबद्दलही त्यांनी सांगितले.