शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

व्हीआयपी संस्कृतीला निरोप, ईपीआय संस्कृतीला रुजवा

By admin | Updated: May 1, 2017 03:59 IST

काही लोकांच्या मनात रुतून बसलेल्या व्हीआयपी संस्कृतीला काढून टाकून त्याऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट) संस्कृती

नवी दिल्ली : काही लोकांच्या मनात रुतून बसलेल्या व्हीआयपी संस्कृतीला काढून टाकून त्याऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट) संस्कृती रुजविण्यासाठी लाल दिव्यांवर बंदी घातल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. १ मेपासून लाल दिवे वाहनांवरून काढून टाकले जातील.लाल दिवे हे अति महत्त्वाची व्यक्ती संस्कृतीचे जणू प्रतीक बनले होते. त्यामुळे ते दिवे वापरणाऱ्यांच्या मनात इतरांबद्दल तुच्छतेची भावना निर्माण झाली होती. या देशातील सगळे १२५ कोटी लोक हे समान दर्जाचे व महत्त्वाचे आहेत, असे मोदी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात म्हणाले. १ मेपासून लाल दिवे वापरण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्री, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांच्यासह सगळ्या सरकारी वाहनांना लागू आहे.वाहनावर एकदा लाल दिवा लागला की, ते व्हीआयपी संस्कृती प्रतीक बनतो व ती संस्कृती मग ते वापरणाऱ्यांच्या डोक्यात जाते, असे मोदी म्हणाले. डोक्यात गेलेली व्हीआयपी संस्कृती काढण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल पेमेंटस्चा आग्रह धरताना मोदी म्हणाले की, युवकांनी कॅश रिवार्डस् दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा. भारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅपचा (भीम) वापर करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देणाऱ्यांना हे कॅश रिवार्डस् दिले जातात. ही योजना १४ आॅक्टोबरपर्यंत सुरू आहे. जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भीम अ‍ॅप वापरण्यास सांगेल व त्या व्यक्तीने तीन व्यवहार डिजिटल केल्यानंतर त्या प्रत्येक वेळी त्याला दहा रुपये कमावता येतील. मोठी स्वप्ने पूर्ण करता येतीलसरकारच्या ‘नवा भारत’ संकल्पनेत व्हीआयपीऐवजी ईपीआय संस्कृतीला महत्त्व दिले जाईल. १२५ कोटी लोकांच्या शक्तीला ओळखले, तर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतील, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी या उन्हाळी सुट्यांचा उपयोग नवी कौशल्ये शिकण्यासाठी करण्याचे व चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन केले. नवी भाषा शिका किंवा नव्या ठिकाणी जा, अशी त्यांची सूचना होती. मागच्या ‘मन की बात’मध्ये मी अन्न वाया जाऊ न देण्याबद्दल बोललो होतो. त्याला अनेक सूचनांनी लोकांनी प्रतिसाद दिला, असे मोदी यांनी सांगितले. हवामान बदलाचा प्रश्न आणि वाढता उन्हाळा याबद्दलही त्यांनी सांगितले.