शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मुलाच्या मृत्यूचा बदला घेणार, शहिदाच्या आईचा पंतप्रधानांना संदेश

By admin | Updated: April 28, 2017 14:14 IST

आयुष यादव यांच्या आईनं मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. तुमच्याकडून कारवाई झाली नाहीतर मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (27 एप्रिल) कुपवाडा येथे लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांमध्ये शहीद कॅप्टन आयुष यादव यांनी दहशतवाद्यांविरोधात देशासाठी लढताना बलिदान दिले.
 
यावर आयुष यादव यांच्या आईनं आपल्या मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई करणार नसतील, तर मी मात्र माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा आक्रोश व्यक्त करत आयुष यादव यांच्या आईनं पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे.  
शहीद आयुष यादव यांचे वडील यांनी केंद्र सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.  
 
शहीद आयुष यादव यांच्या वडिलांचे सरकारला प्रश्न
उत्तर प्रदेशातील कानपूर रहिवासी असणारे शहीद आयुष यादव यांचे वडील अरुण यादव यांनी सरकारला विचारले की, "मी तर माझा मुलगा गमावला मात्र कुठंपर्यंत देश आपल्या मुलांना अशाप्रकारे गमावत बसणार आहे". दरम्यान, आयुष यादव हा अरुण यांचा एकुलताएक मुलगा होता.   
 
कुपवाडा दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 27 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंझगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनाही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी संघटना "जैश-ए-मोहम्मद" या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.  
 
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद
छत्तीसगड येथील सुकमामध्ये नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले होते.
 
"अशा प्रकारे कधीपर्यंत देशातील जवानांना बलिदान द्यावे लागणार?", शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनीही सरकारला प्रश्न विचारत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.