शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूचा बदला घेणार, शहिदाच्या आईचा पंतप्रधानांना संदेश

By admin | Updated: April 28, 2017 14:14 IST

आयुष यादव यांच्या आईनं मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. तुमच्याकडून कारवाई झाली नाहीतर मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (27 एप्रिल) कुपवाडा येथे लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांमध्ये शहीद कॅप्टन आयुष यादव यांनी दहशतवाद्यांविरोधात देशासाठी लढताना बलिदान दिले.
 
यावर आयुष यादव यांच्या आईनं आपल्या मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई करणार नसतील, तर मी मात्र माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा आक्रोश व्यक्त करत आयुष यादव यांच्या आईनं पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे.  
शहीद आयुष यादव यांचे वडील यांनी केंद्र सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.  
 
शहीद आयुष यादव यांच्या वडिलांचे सरकारला प्रश्न
उत्तर प्रदेशातील कानपूर रहिवासी असणारे शहीद आयुष यादव यांचे वडील अरुण यादव यांनी सरकारला विचारले की, "मी तर माझा मुलगा गमावला मात्र कुठंपर्यंत देश आपल्या मुलांना अशाप्रकारे गमावत बसणार आहे". दरम्यान, आयुष यादव हा अरुण यांचा एकुलताएक मुलगा होता.   
 
कुपवाडा दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 27 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंझगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनाही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी संघटना "जैश-ए-मोहम्मद" या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.  
 
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद
छत्तीसगड येथील सुकमामध्ये नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले होते.
 
"अशा प्रकारे कधीपर्यंत देशातील जवानांना बलिदान द्यावे लागणार?", शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनीही सरकारला प्रश्न विचारत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.