शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
3
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
4
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
5
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
6
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
7
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
8
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
9
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
10
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
11
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
12
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
13
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
14
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
15
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
16
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
17
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूचा बदला घेणार, शहिदाच्या आईचा पंतप्रधानांना संदेश

By admin | Updated: April 28, 2017 14:14 IST

आयुष यादव यांच्या आईनं मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. तुमच्याकडून कारवाई झाली नाहीतर मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (27 एप्रिल) कुपवाडा येथे लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांमध्ये शहीद कॅप्टन आयुष यादव यांनी दहशतवाद्यांविरोधात देशासाठी लढताना बलिदान दिले.
 
यावर आयुष यादव यांच्या आईनं आपल्या मुलाच्या शहीद होण्यावर पंतप्रधानांकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई करणार नसतील, तर मी मात्र माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेणार, असा आक्रोश व्यक्त करत आयुष यादव यांच्या आईनं पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे.  
शहीद आयुष यादव यांचे वडील यांनी केंद्र सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.  
 
शहीद आयुष यादव यांच्या वडिलांचे सरकारला प्रश्न
उत्तर प्रदेशातील कानपूर रहिवासी असणारे शहीद आयुष यादव यांचे वडील अरुण यादव यांनी सरकारला विचारले की, "मी तर माझा मुलगा गमावला मात्र कुठंपर्यंत देश आपल्या मुलांना अशाप्रकारे गमावत बसणार आहे". दरम्यान, आयुष यादव हा अरुण यांचा एकुलताएक मुलगा होता.   
 
कुपवाडा दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 27 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंझगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनाही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी संघटना "जैश-ए-मोहम्मद" या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.  
 
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद
छत्तीसगड येथील सुकमामध्ये नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले होते.
 
"अशा प्रकारे कधीपर्यंत देशातील जवानांना बलिदान द्यावे लागणार?", शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनीही सरकारला प्रश्न विचारत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.