शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:15 IST

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा; सरकारी बँकांची संख्या २७ वरून १२ वर

नवी दिल्ली : सहा वर्षांच्या नीचांकावर गेलेल्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण करून चार बँकांची निर्मिती करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोजक्याच, पण जागतिक आकाराच्या मजबूत बँकांची निर्मिती करण्याच्या नियोजित धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. गेल्याच आठवड्यात अर्थव्यवस्थेसाठी सवलतींचा मोठा ‘बूस्टर डोस’ सीतारामन यांनी जाहीर केला होता. त्यापाठोपाठ बँकांच्या विलीनीकरणाची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. विलीनीकरणानंतर सरकारी बँकांची संख्या १२ होईल, तसेच विलीनीकरण करताना कोणत्याही प्रकारे कर्मचारी कपात केली जाणार नाही, असे सीतारामन यांनी नमूद केले.

सीतारामन यांनी सांगितले की, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आणि युनायटेड बँक आॅफ इंडिया यांचे विलीनीकरण करून देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक निर्माण केली जाईल. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलीनीकरण केले जाईल. युनियन बँक आॅफ इंडियाकडून आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेला सामावून घेतले जाईल. इंडियन बँकेचे अलाहाबाद बँकेत विलीनीकरण केले जाईल. सीतारामन यांनी सांगितले की, विलीनीकरणामुळे बँकांचा ताळेबंद मजबूत होईल, तसेच त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल. ओरियंटल बँक आॅफ कॉमर्स आणि युनाटेड बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण केले जाईल. विलीनीकरणानंतर निर्माण होणाºया या बँकेचा व्यवसाय तब्बल १७.९५ लाख कोटी रुपयांचा असेल, तसेच बँकेच्या शाखा ११,४३७ असतील. सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँकेच्या विलीनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील चौथी मोठी बँक निर्माण होईल. तिचा व्यवसाय १५.२0 लाख कोटी, तर शाखा १0,३२0 असतील. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण केल्यानंतर निर्माण होणारी बँक पाचव्या क्रमांकाची मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असेल. तिचा व्यवसाय १४.५९ लाख कोटी, तर शाखा ९,६0९ असतील.

अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण केल्यानंतर निर्माण होणारी बँक सातव्या क्रमांकाची मोठी सार्वजनिक बँक असेल. तिचा व्यवसाय ८.0८ लाख कोटींचा असेल. बँक आॅफ इंडिया आणि सेंट्रल बँक आॅफ इंडिया आधीप्रमाणेच कायम राहतील.बँकांच्या विलीनीकरणाच्या दोन फेºया याआधी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच सरकारने देना बँक आणि विजया बँक यांचे बँक आॅफ बडोदामध्ये विलीनीकरण करून कर्जाच्या दृष्टीने तिसºया क्रमांकाची मोठी बँक निर्माण केली होती.प्रशासकीय सुधारणा राबविणारसीतारामन यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत प्रशासकीय सुधारणा (गव्हर्नन्स रिफॉर्म्स) राबविण्यात येत आहेत. बँकांच्या बोर्डांना स्वायत्तता दिली जाईल. त्यांना उत्तराधिकाऱ्यांविषयीचे नियोजन करता येईल. स्वतंत्र संचालकांचा बैठक भत्ता ठरविण्याचा अधिकार त्यांना असेल. जनरल मॅनेजर आणि त्यावरील अधिकारी, तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्या कामाचे मूल्यमापन बोर्ड समिती करील.देशात मोठ्या बँकांची गरज नाही : वेंकटचलमभारतामध्ये मोठ्या बँका व बँकांचे मोठ्या प्रमाणावरील विलीनीकरण या दोन्ही गोष्टींची गरज नाही, अशी प्रतिक्रिया आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे (एआयबीइए) सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी शुक्रवारी व्यक्त केली.ते म्हणाले की, आपला देश खूप मोठा असून, अजूनही अनेक गावांमध्ये बँकिंगची सुविधा उपलब्ध नाही. बँकांच्या विलीनीकरणाविरोधात बँक कर्मचारी उद्या, शनिवारी देशभरात उग्र निदर्शने करतील. आम्ही या निर्णयाविरोधात मोठा लढा उभारू.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन