शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महामार्गाचे काम केंद्र शासन करणार रक्षा खडसे : सावदा, रावेर, निंभोरा येथे केळीची मोजणी

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अजिंठा विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार खडसे म्हणाल्या की, चिखली ते फागणे या टप्प्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे तीन वेळा निविदा काढण्यात आली. मात्र तिन्ही वेळा प्रतिसाद न मिळाला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या कामासाठी हायब्रीड पद्धतीने काम करण्याचा पर्याय होता. त्यात ४० टक्के शासन व ६० टक्के ठेकेदार असा पर्याय होता. मात्र तो प्रस्तावदेखील रद्द करण्यात आला. त्यामुळे आता संपूर्ण निधीची तरतूद करून केंद्र शासन या रस्त्याचे काम करणार आहे. त्यासाठी काही दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे अभियंत्यांचा प्रश्न लावला मार्गी
भुसावळ रेल्वे सह देशभरातील ८० हजार अभियंत्यांना देण्यात आलेला ग्रेड पे व पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. संसदेच्या अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांनी दखल घेत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच वरणगाव फॅक्टरीत प्रशिक्षणार्थी कालावधित काम करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राअभावी अडचणी येत होत्या. त्याबाबत चर्चा करून तो प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्‘ात होणार केळीची मोजणी
जिल्‘ात केळीचे मोठे क्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेद्वारे केळीची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे व शेतकरी यांचे नुकसान होत होते. शेतकर्‍यांना ट्रकद्वारे केळीची वाहतुकीसाठी व्यापार्‍यांवर अवलंबून रहावे लागत होते. या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करीत जळगाव येथे केळीची मोजणी करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे आता सावदा, रावेर, निंभोरा या ठिकाणी केळीचा माल मोजता येणार आहे. यापूर्वी हा माल झांसी येथे मोजण्यात येत होता. शेतकर्‍यांनी बीपीओ ट्रेनची मागणी केली होती. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आपल्या मालाची विक्री करू शकणार आहे.