शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम केंद्र शासन करणार रक्षा खडसे : सावदा, रावेर, निंभोरा येथे केळीची मोजणी

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चिखली ते फागणे या टप्प्याच्या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने यापुढे हे काम आता केंद्र शासनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अजिंठा विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार खडसे म्हणाल्या की, चिखली ते फागणे या टप्प्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे तीन वेळा निविदा काढण्यात आली. मात्र तिन्ही वेळा प्रतिसाद न मिळाला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या कामासाठी हायब्रीड पद्धतीने काम करण्याचा पर्याय होता. त्यात ४० टक्के शासन व ६० टक्के ठेकेदार असा पर्याय होता. मात्र तो प्रस्तावदेखील रद्द करण्यात आला. त्यामुळे आता संपूर्ण निधीची तरतूद करून केंद्र शासन या रस्त्याचे काम करणार आहे. त्यासाठी काही दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे अभियंत्यांचा प्रश्न लावला मार्गी
भुसावळ रेल्वे सह देशभरातील ८० हजार अभियंत्यांना देण्यात आलेला ग्रेड पे व पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. संसदेच्या अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा झाली. रेल्वेमंत्र्यांनी दखल घेत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच वरणगाव फॅक्टरीत प्रशिक्षणार्थी कालावधित काम करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राअभावी अडचणी येत होत्या. त्याबाबत चर्चा करून तो प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्‘ात होणार केळीची मोजणी
जिल्‘ात केळीचे मोठे क्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेद्वारे केळीची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे व शेतकरी यांचे नुकसान होत होते. शेतकर्‍यांना ट्रकद्वारे केळीची वाहतुकीसाठी व्यापार्‍यांवर अवलंबून रहावे लागत होते. या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करीत जळगाव येथे केळीची मोजणी करण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे आता सावदा, रावेर, निंभोरा या ठिकाणी केळीचा माल मोजता येणार आहे. यापूर्वी हा माल झांसी येथे मोजण्यात येत होता. शेतकर्‍यांनी बीपीओ ट्रेनची मागणी केली होती. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आपल्या मालाची विक्री करू शकणार आहे.