शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मायावतींना संताप अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:38 IST

सहारणपूरमध्ये दलितांवर झालेल्या अत्याचारावर बोलण्यास पुरेशी संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी राज्यसभेच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सहारणपूरमध्ये दलितांवर झालेल्या अत्याचारावर बोलण्यास पुरेशी संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा देऊ, अशी धमकी देत सभात्याग केला होता. पण त्या प्रत्यक्ष राजीनामा देतील, असे तेव्हा कोणाला वाटले नव्हते. मात्र त्यांच्या या विधानानंतर झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले होते.सभागृहाचे कामकाज सुरू होताच, मायावती यांनी उत्तर प्रदेशात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. सहारनपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत मायावती यांनी भाजपाने जाणिवपूर्वक हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला. या विषयावरील त्यांना स्थगन प्रस्ताव मांडला होता. पण त्यावर केवळ तीन मिनिटेच बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी भाजपावर आरोप करताच, सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणायला सुरुवात केली. तोपर्यंत तीन मिनिटे संपल्याने उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या मायावती यांनी आपणास बोलू दिले जात नसल्याचा आरोप कशला आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची धमकी दिली. त्या लगेच सभागृहातून निघून गेल्या. त्याआधी काँग्रेसचे गुलाब नबी आझाद यांनी आपण या विषयावर चर्चेची नोटिस दिल्याचेही उपसभापतींच्या निदर्शनाण आणून दिले. पण तोपर्यंत सभागृहात गदारोळ सुरू झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आले. मायावती यांनी केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर कडाडून टीका केली. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी करताच, मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा सदस्यांनी केली. ते त्यांना बोलू देत नसल्याने मायावती सभागृहाबाहेर पडल्या. बाहेर आल्यावरही पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी रागाच्या भरात तो इशारा दिला, असे अनेकांना वाटले होते.काँग्रेससह विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्नविरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार व शेतकरी समस्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. असे प्रकार करण्यासाठी आपल्याला बहुमत मिळाले, असे भाजपाला वाटत असेल, तर आम्ही सरकारशी सहकार्य करणार नाही, असा इशारा आझाद यांनीही दिला. त्यावेळी मोदी सरकार दलितविरोधी असल्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. काही सदस्य तर सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊ न घोषणा देत होते. वरील प्रश्नांबरोबरच चीनची घुसखोरीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा काँग्रेससह विरोधकांचा प्रयत्न आहे. त्याचे दर्शन पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच घडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीवरून लोकसभाही तहकूबलोकसभेतही विरोधी सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार आदी मुद्यांवरून प्रश्नोत्तराच्या तासात आणि नंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. गोमाता बहाना है, कर्जमाफी से ध्यान हटाना है, विजय मल्या को भगाया, किसानों को रुलाया आदी घोषणांचे फलकही काही विरोधी सदस्य फडकावत होते. त्याच वेळी कर्नाटकातील प्रामाणिक पोलीस महानिरीक्षक (तुरुंग)डी. रूपा यांची बदली केल्याबद्दल भाजपचे सदस्य काँग्रेसचा निषेध करीत होते.