शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मायावतींनी दिला राज्यसभेचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 17:46 IST

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18- बसपाच्या प्रमुख मायावती यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलायला न दिल्याने नाराज मायावतींनी राजीनामा दिला आहे. राज्यसभेच्या सभापतींना तीन पानांचं पत्र लिहून मायावतींना राजीनामा सुपूर्द केला. पुढील वर्षी एप्रिलमध्ये मायावती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार होता. बसपाचे महासचिव सतिश मिश्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
 
राज्यसभेत मला माझ्या मुद्द्यावर बोलू द्या नाहीतर मी राजीनामा देईन, असा इशारा मायावती यांनी राज्यसभेत दिला होता. त्यानंतरच मायावती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  राज्यसभेत  मायावती यांनी दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. सहारनपुरमध्ये झालेल्या हिंसेचा संदर्भ देत मायावती यांनी आपला मुद्दा मांडला. भाजपाने जाणिवपूर्वक हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप मायावती यांनी राज्यसभेत केला. तसंच या संदर्भातील स्थगन प्रस्ताव मायावती यांनी मांडला होता. पण या प्रस्तावावर बोलायला मायावती यांना राज्यसभेत फक्त तीन मिनीटांची वेळ देण्यात आला होता. प्रस्तावावर बोलत असताना सभापतींनी वेळ संपल्यामुळे मायावती यांना थांबायला सांगितलं. आपल्या मुद्द्यावर मुद्दामून बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत मायावती यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. मी ज्या समाजातून आली आहे, त्याच समाजाबद्दलच्या गंभीर बाबी मला सभेत मांडू दिल्या जात नसल्याने आपल्या पदाचा उपयोग काय? असं म्हणत मायावतींनी राजीनामा दिला. मायावती यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर सभेत काहीवेळासाठी गदारोळ झाला. या गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. दलित अत्याचाराच्या मुद्द्यावर सरकारी पक्षाकडून बोलू दिलं जात नाही, याचा निषेध आहे, असंही मायावती माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत. 
 
राज्यसभेत दलितांवरील अत्याचाराच्या घटनांवरून बसपा प्रमुख मायावती यांनी सरकारवर कडाडून टीका केली. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मला सभागृहात बोलू दिलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन असा इशाराही मायावतींनी दिला. त्यानंतरही भाजपनं माफीची मागणी लावून धरली. त्यामुळे त्या सभागृहाबाहेर पडल्या होत्या. सभागृहातून बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना मायावती यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. सरकार जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर मायावती यांनी अपमान केला असून सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. मायावती बोलत असताना त्यांना सभापतींनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला बोलू दिलं नाही तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा दिला
आणखी वाचा
 

डोकलाम वाद चिघळल्यास होईल भीषण युद्ध, चीनी माध्यमांची धमकी

पाकिस्तानी घराघरात पुन्हा लागणार भारतीय टीव्ही मालिका

जम्मू-काश्मीरप्रमाणे वेगळा झेंडा द्या, कर्नाटक सरकारची मागणी

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांकडून हिंसाचार आणि शेतकरी समस्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सरकारला जर याच घटनांसाठी बहुमत दिलं असेल तर आम्ही या सरकारसोबत नाही, असं आझाद म्हणाले होते. हे सरकार दलितविरोधी असल्याच्या घोषणा विरोधकांनी केल्या. तर सदस्यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. शेतकरी आंदोलन, कथित गोरक्षकांच्या हिंसाचाराचा मुद्दा, जम्मू-काश्मीरमधील अशांत परिस्थिती, चीनची घुसखोरी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा काँग्रेससह विरोधकांचा प्रयत्न आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत या मुद्द्यांवरून सरकारला घेरल्याचं पाहायला मिळालं.