शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मायावती-अखिलेश यांच्या गठबंधनची जादू चाललीच नाही! भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:12 IST

उत्तर प्रदेशात धार्मिक धु्रवीकरण करण्यात आले. त्याचा परिणाम हिंदुत्वाचे कार्ड चालविल्यामुळे आणि मुस्लिम मतदारांनी देखील भाजपला साथ दिल्याने सपा-बसपाला मतदारांनी नाकारले आहे.

लखनऊ : राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपपेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकेल, असा निष्कर्ष एक्झिट पोलमधून पुढे आला होता. मात्र, केवळ २० जागांवरच मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसनेदेखील या ठिकाणी कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. मात्र, या ठिकाणी देखील रायबरेलीतून सोनिया गांधी या आघाडीवर असून, अमेठीतून राहुल गांधी मात्र पिछाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा येथे सुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना निवडणूक प्रचारात उतरवूनदेखील फारसा परिणाम झाला नसल्याचेच दिसत आहे. हीच परिस्थिती सपा आणि बसपाची देखील आहे.

काही प्रमुख उमेदवार वगळता अनेक मातब्बर उमेदवारांनादेखील मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये ५० पेक्षा अधिक जागा सपा-बसपाला मिळेल आणि ४० जागांवर भाजपला फटका बसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, भाजपने पुन्हा मुसंडी मारली असून, मतदारांनीदेखील भाजपच्याच बाजूने कौल दिला आहे. २०१४ मध्ये भाजपला मतदारांनी ७१ जागा भाजपला दिल्या होत्या. आता त्यात १२ जागा कमी झाल्या आहेत. मात्र, जे मुद्दे निवडणूक प्रचारात उपस्थित करण्यात आले होते. त्याचा मतदारांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. विशेषत: गोहत्या, मॉब लिंचिंग, नोटबंदी, जीएसटी, तीन तलाक या कोणत्याही गोष्टींचा परिणाम मतदारांवर झालेला नाही. भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला दूर ठेवून सप व बसपने आघाडी केली होती.योगी आदित्यनाथविरोधकांनी केलेले नकारात्मक पॉलिटिक्स जनतेने नाकारले. मोदी लाट होती. ती फक्त सुप्त होती. त्यामुळेच उत्तर प्रदेशात आम्ही यश मिळविले आहे. या वेळी थोड्या जागा कमी झाल्या, तरी मतदार आमच्यासोबत आहेत.

प्रियांका गांधी

मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या प्रियांका गांधी यांचा फार परिणाम दिसला नाही. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो आणि भाजप आणि मोदींचे अभिनंदन करतो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

मायावतीसपा-बसपा यांनी गठबंधन केले. मात्र, त्याचा परिणाम मतांमध्ये होताना दिसला नाही. अखिलेश यादव आणि मायावती यांनी मागचे वैर विसरून केलेल्या आघाडीला मतदारांनी स्वीकारले नाही. त्यामुळेच या वेळी गठबंधन अयशस्वी ठरले आहे.

अखिलेश यादवबहुजन समाज पक्षाला सोबत घेऊन मुसंडी मारता येईल, असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. मात्र, मतदारांनी पुन्हा भाजपलाच कौल दिला असून, आगामी काळात गठबंधन काय भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे.निकालाची कारणेपंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शहा यांची स्टॅटेजी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळेच मतांचे धु्रवीकरण झाल्याने भाजपला मुसंडी मारता आली.प्रियांका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात उतरविले होते. मात्र, त्यांचीही जादू या ठिकाणी चालली नाही. जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला नाही.मोदी सरकारने ५ वर्षे केलेले काम आणि लोकांशी असलेला संवाद ठेवला तो या वेळी कामी आला.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019