शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मायावती-अखिलेश यांच्या गठबंधनची जादू चाललीच नाही! भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:12 IST

उत्तर प्रदेशात धार्मिक धु्रवीकरण करण्यात आले. त्याचा परिणाम हिंदुत्वाचे कार्ड चालविल्यामुळे आणि मुस्लिम मतदारांनी देखील भाजपला साथ दिल्याने सपा-बसपाला मतदारांनी नाकारले आहे.

लखनऊ : राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपपेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकेल, असा निष्कर्ष एक्झिट पोलमधून पुढे आला होता. मात्र, केवळ २० जागांवरच मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसनेदेखील या ठिकाणी कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. मात्र, या ठिकाणी देखील रायबरेलीतून सोनिया गांधी या आघाडीवर असून, अमेठीतून राहुल गांधी मात्र पिछाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा येथे सुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना निवडणूक प्रचारात उतरवूनदेखील फारसा परिणाम झाला नसल्याचेच दिसत आहे. हीच परिस्थिती सपा आणि बसपाची देखील आहे.

काही प्रमुख उमेदवार वगळता अनेक मातब्बर उमेदवारांनादेखील मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये ५० पेक्षा अधिक जागा सपा-बसपाला मिळेल आणि ४० जागांवर भाजपला फटका बसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, भाजपने पुन्हा मुसंडी मारली असून, मतदारांनीदेखील भाजपच्याच बाजूने कौल दिला आहे. २०१४ मध्ये भाजपला मतदारांनी ७१ जागा भाजपला दिल्या होत्या. आता त्यात १२ जागा कमी झाल्या आहेत. मात्र, जे मुद्दे निवडणूक प्रचारात उपस्थित करण्यात आले होते. त्याचा मतदारांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. विशेषत: गोहत्या, मॉब लिंचिंग, नोटबंदी, जीएसटी, तीन तलाक या कोणत्याही गोष्टींचा परिणाम मतदारांवर झालेला नाही. भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला दूर ठेवून सप व बसपने आघाडी केली होती.योगी आदित्यनाथविरोधकांनी केलेले नकारात्मक पॉलिटिक्स जनतेने नाकारले. मोदी लाट होती. ती फक्त सुप्त होती. त्यामुळेच उत्तर प्रदेशात आम्ही यश मिळविले आहे. या वेळी थोड्या जागा कमी झाल्या, तरी मतदार आमच्यासोबत आहेत.

प्रियांका गांधी

मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या प्रियांका गांधी यांचा फार परिणाम दिसला नाही. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो आणि भाजप आणि मोदींचे अभिनंदन करतो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

मायावतीसपा-बसपा यांनी गठबंधन केले. मात्र, त्याचा परिणाम मतांमध्ये होताना दिसला नाही. अखिलेश यादव आणि मायावती यांनी मागचे वैर विसरून केलेल्या आघाडीला मतदारांनी स्वीकारले नाही. त्यामुळेच या वेळी गठबंधन अयशस्वी ठरले आहे.

अखिलेश यादवबहुजन समाज पक्षाला सोबत घेऊन मुसंडी मारता येईल, असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. मात्र, मतदारांनी पुन्हा भाजपलाच कौल दिला असून, आगामी काळात गठबंधन काय भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे.निकालाची कारणेपंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शहा यांची स्टॅटेजी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळेच मतांचे धु्रवीकरण झाल्याने भाजपला मुसंडी मारता आली.प्रियांका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात उतरविले होते. मात्र, त्यांचीही जादू या ठिकाणी चालली नाही. जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला नाही.मोदी सरकारने ५ वर्षे केलेले काम आणि लोकांशी असलेला संवाद ठेवला तो या वेळी कामी आला.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019