शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

युरीयाचा सर्वाधिक वापर मागील वर्षाची स्थिती : एकूण चार लाख ७० हजार ६७४ मे.टन खतांचा वापर

By admin | Updated: April 26, 2016 23:10 IST

जळगाव : युरीयासह इतर रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका, माती व पाणी परीक्षण कार्यक्रमांना शासनाने प्रोत्साहन दिले, परंतु असे असतानाही जिल्‘ात मागील खरीप व रब्बी हंगामात सर्वाधिक एक लाख ७९ हजार ८४४ मे.टन एकट्या युरीयाचा वापर झाल्याचे समोर आले आहे.

जळगाव : युरीयासह इतर रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका, माती व पाणी परीक्षण कार्यक्रमांना शासनाने प्रोत्साहन दिले, परंतु असे असतानाही जिल्‘ात मागील खरीप व रब्बी हंगामात सर्वाधिक एक लाख ७९ हजार ८४४ मे.टन एकट्या युरीयाचा वापर झाल्याचे समोर आले आहे.
२०१५ - १६ च्या खरीप व रब्बी हंगामात विविध रासायनिक खतांचा वापर चार लाख ७० हजार ६७४ मे.टन एवढा झाला आहे. जमिनीत किंवा शेतात कुठले अन्नघटक आहेत किंवा कुठल्या घटकांची कमतरता आहे याची तपासणी करण्यासाठी मागील वर्षात जिल्हाभरातील १५०० गावांपैकी ४२३ गावांमधून ४० हजार ६१३ मृत नमुने गोळा करण्यात आले. जेवढा लक्ष्यांक दिला तेवढे नमुने मृत सर्वेक्षण व तपासणी प्रयोगशाळेने संकलीत केले. त्यांची मृत सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणी करून एक लाख २६ हजार २१२ शेतकर्‍यांना जमिनीच्या आरोग्यपत्रिकांचे वितरण झाले. अर्थातच मृद किंवा जमीन तपासणी कार्यक्रम गावोगावी पोहोचलेला नाही. अनेक शेतकर्‍यांना आपल्या जमिनीत कुठल्या अन्नघटकाची कमतरता आहे याची नेमकी माहिती अजूनही नाही. यामुळे युरीया व इतर खतांच्या वापराचे प्रमाण अधिक आहे.

विविध खतांच्या वापराची माहिती
(आकडे मे.टनमध्ये)
खतांचा प्रकारखरीपरब्बी
युरीया१२३७२१५६१२३
डीएपी१४३२५८५६३
सुपर फॉस्फेट४३५७५४२६७०
पोटॅश३८४६९३२८७५
अमोनियम सल्फेट३२१७२२१५
२०.२०.०१०९८१२४७७
१५.१५.१५९०२०१२६२२
२४.२४.०२६०२२६३०
१०.२६.२६२७७५८२३७७५
१२.३२.१६१३०२२१८०
१६.१६.१६७२५५१२४९
१९.१९.१९६५१००५

एकूण-२८२२९०१८८३८४


यंदाही मागणी अधिक
युरीयाचा सर्वाधिक वापर होत असल्याने यंदाच्या म्हणजेच २०१६ च्या खरिपासाठी एक लाख २६ हजार ७०० मे.टन युरीयाची मागणी करण्यात आली आहे. यापाठोपाठ मिश्र अर्थात १०.२६.२६, १२.३२.१६ आदी प्रकारच्या खतांची ८३ हजार ९०० मे.टन एवढी मागणी कृषि आयुक्तालयाकडे जि.प.च्या कृषि विभागाने नोंदविली आहे. तर मिश्र, सरळ खते मिळून यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाख ४७ हजार ३०० मे.टन एवढी खते जिल्‘ास विविध टप्प्यात मिळणार आहेत. अजून हा पुरवठा झालेला नाही. परंतु जून महिन्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील खतांचा पुरवठा होईल.

मागील खरीप व रब्बी हंगामाचे ८० हजार मे.टन खत शिल्लक आहे. त्यामुळे अजून पुरवठा सुरू झालेला नाही. शिल्लक खताचा वापर गरज पडेल तेव्हा सुरू करता येईल. युरीयाची गरज अधिक असल्याने त्याची मागणीही कृषि आयुक्तालयाकडे अधिक केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.