शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युरीयाचा सर्वाधिक वापर मागील वर्षाची स्थिती : एकूण चार लाख ७० हजार ६७४ मे.टन खतांचा वापर

By admin | Updated: April 26, 2016 23:10 IST

जळगाव : युरीयासह इतर रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका, माती व पाणी परीक्षण कार्यक्रमांना शासनाने प्रोत्साहन दिले, परंतु असे असतानाही जिल्‘ात मागील खरीप व रब्बी हंगामात सर्वाधिक एक लाख ७९ हजार ८४४ मे.टन एकट्या युरीयाचा वापर झाल्याचे समोर आले आहे.

जळगाव : युरीयासह इतर रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका, माती व पाणी परीक्षण कार्यक्रमांना शासनाने प्रोत्साहन दिले, परंतु असे असतानाही जिल्‘ात मागील खरीप व रब्बी हंगामात सर्वाधिक एक लाख ७९ हजार ८४४ मे.टन एकट्या युरीयाचा वापर झाल्याचे समोर आले आहे.
२०१५ - १६ च्या खरीप व रब्बी हंगामात विविध रासायनिक खतांचा वापर चार लाख ७० हजार ६७४ मे.टन एवढा झाला आहे. जमिनीत किंवा शेतात कुठले अन्नघटक आहेत किंवा कुठल्या घटकांची कमतरता आहे याची तपासणी करण्यासाठी मागील वर्षात जिल्हाभरातील १५०० गावांपैकी ४२३ गावांमधून ४० हजार ६१३ मृत नमुने गोळा करण्यात आले. जेवढा लक्ष्यांक दिला तेवढे नमुने मृत सर्वेक्षण व तपासणी प्रयोगशाळेने संकलीत केले. त्यांची मृत सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणी करून एक लाख २६ हजार २१२ शेतकर्‍यांना जमिनीच्या आरोग्यपत्रिकांचे वितरण झाले. अर्थातच मृद किंवा जमीन तपासणी कार्यक्रम गावोगावी पोहोचलेला नाही. अनेक शेतकर्‍यांना आपल्या जमिनीत कुठल्या अन्नघटकाची कमतरता आहे याची नेमकी माहिती अजूनही नाही. यामुळे युरीया व इतर खतांच्या वापराचे प्रमाण अधिक आहे.

विविध खतांच्या वापराची माहिती
(आकडे मे.टनमध्ये)
खतांचा प्रकारखरीपरब्बी
युरीया१२३७२१५६१२३
डीएपी१४३२५८५६३
सुपर फॉस्फेट४३५७५४२६७०
पोटॅश३८४६९३२८७५
अमोनियम सल्फेट३२१७२२१५
२०.२०.०१०९८१२४७७
१५.१५.१५९०२०१२६२२
२४.२४.०२६०२२६३०
१०.२६.२६२७७५८२३७७५
१२.३२.१६१३०२२१८०
१६.१६.१६७२५५१२४९
१९.१९.१९६५१००५

एकूण-२८२२९०१८८३८४


यंदाही मागणी अधिक
युरीयाचा सर्वाधिक वापर होत असल्याने यंदाच्या म्हणजेच २०१६ च्या खरिपासाठी एक लाख २६ हजार ७०० मे.टन युरीयाची मागणी करण्यात आली आहे. यापाठोपाठ मिश्र अर्थात १०.२६.२६, १२.३२.१६ आदी प्रकारच्या खतांची ८३ हजार ९०० मे.टन एवढी मागणी कृषि आयुक्तालयाकडे जि.प.च्या कृषि विभागाने नोंदविली आहे. तर मिश्र, सरळ खते मिळून यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाख ४७ हजार ३०० मे.टन एवढी खते जिल्‘ास विविध टप्प्यात मिळणार आहेत. अजून हा पुरवठा झालेला नाही. परंतु जून महिन्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील खतांचा पुरवठा होईल.

मागील खरीप व रब्बी हंगामाचे ८० हजार मे.टन खत शिल्लक आहे. त्यामुळे अजून पुरवठा सुरू झालेला नाही. शिल्लक खताचा वापर गरज पडेल तेव्हा सुरू करता येईल. युरीयाची गरज अधिक असल्याने त्याची मागणीही कृषि आयुक्तालयाकडे अधिक केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.