शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये मुसळधार; विजा पडून ७० मृत्युमुखी

By admin | Updated: June 23, 2016 01:47 IST

बिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून आता ७0 लोक मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी झाले आहेत.

एस.पी. सिन्हा,  पाटणाबिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून आता ७0 लोक मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपत्कालीन बैठक घेतली आणि बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.राज्यात मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने सर्वसामान्यांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी पावसाने घातलेल्या थैमानाने अनेक घरांवर दु:खाची कुऱ्हाडच कोसळली. आपत्ती व्यवस्थापनमंत्री चंद्रशेखर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आतापर्यत ५६-५७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.१५ जिल्ह्यांमध्ये कहरआपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सांगण्यानुसार हे मृत्यू राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. पाटणा जिल्ह्यात सर्वाधिक सहा जण ठार झाले. तर रोहतास आणि बक्सरमध्ये प्रत्येकी पाच लोकांचा बळी गेला. याशिवाय भोजपूर, नालंदा, कैमूर, औरंगाबाद आणि पूर्णियात प्रत्येकी चार जण ठार झाले. तर सहरसा, किटहार आणि सारण जिल्ह्यात प्रत्येकी तिघांचा बळी गेला. भागलपूर, मुंगेर आणि समस्तीपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन जण मृत्युमुखी पडले. बांका, मधेपुरा, मुजफ्फरपूर आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात एक-एक जण ठार झाला. इतर भागात आणखी तीन मृत्यू झाले. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. सर्व जखमींवर जिल्हा प्रशासनाकडून उपचार केले जात असल्याचे विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)नद्यांमधील पाण्याची पातळी वाढलीदुसरीकडे नेपाळचे तराई क्षेत्र आणि उत्तर बिहारच्या जलग्रहण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांमधील पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील अनेक ठिकाणी दबाव निर्माण झाला आहे. परिस्थिती लक्षात घेता जलसंसाधन विभागाने अलर्ट जारी केला आहे. नेपाळमध्ये कोसी नदीच्या वराह आणि वीरपूर क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोसीसोबतच नेपाळमधून उत्तर बिहारकडे वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय पश्चिमेकडील वाल्मीकीनगरमध्ये सुरूअसलेल्या पावसाने गंडक नदीही फुगत चालली आहे. सोन नदीचीही हीच स्थिती आहे. उत्तर प्रदेशात वीज कोसळून २४ ठारगाझीपूर : उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील जमानिया तहसिलीअंतर्गत अनेक गावांमध्ये पावसामुळे वीज कोसळून २४ जण ठार तर चार जखमी झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरिबल्लमपूर गावात संतोष आणि गुलाब यादव हे दोघे मंगळवारी गुरे चराईसाठी घेऊन गेले असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊन त्यांच्यावर वीज कोसळली. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर घटनांत मौहाली गावात वीज कोसळून बालेश्वर यादव, पियरीत कुंदन, हमीदपूरमध्ये रीना यादव आणि उनियात जुनेद खा यांचा मृत्यू झाला. मुख्यालयात देखरेख कक्षया नद्यांवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यालयात देखरेख कक्ष स्थापन केला आहे. पुराच्या परिस्थितीत हा कक्ष नद्यांमधील पाण्यांच्या पातळीसोबतच किनाऱ्यावरील भागावर लक्ष ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये वीज कोसळून झालेल्या मृत्यूच्या घटनांबद्दल शोक व्यक्त केला आहे.