शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

भाजपावासी झालेल्या 200 मुस्लिमांना मशिदीत No Entry

By admin | Updated: June 23, 2017 14:38 IST

त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं जवळपास 25 कुटुंबातील 200 मुस्लिमांना मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं जवळपास 25 कुटुंबातील 200 मुस्लिमांवर मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातील सदस्यांनी या 200 मुस्लिमांना मशिदीत प्रवेश बंदी केली आहे. फक्त आणि फक्त मार्क्सवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन या मुस्लिम कुटुंबांनी भाजपा प्रवेश केला, म्हणून 25 कुटुंबांतील 200 मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्रीची  #NoEntry कारवाई करण्यात आली आहे. 
 
"जनसत्ता"नं दिलेल्या वृत्तानुसार, या मुस्लिम कुटुंबांवर मार्क्सवादी पार्टीमध्ये घरवापसी करण्यासाठीही दवाब टाकण्यात आला. इतकंच नाही तर भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी न दिल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येईल, अशी धमकी दिली जात आहे. त्रिपुरातील शांतीबाजार परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे.  या 25 मुस्लिम कुटुंबातील 200 जणांनी मार्क्सवादी पार्टी सोडून भाजपाचं सदस्यत्व स्वीकारले आहे, त्यांना न केवळ मशिदीत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे तर मनरेगामध्येही काम करण्यापासून वगळण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या 25 मुस्लिम कुटुंब भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी तेव्हाच रोखण्यात आलं जेव्हा त्यांनी मार्क्सवादी पार्टीला सोडचिठ्ठी दिली. मात्र, सर्वजण आपल्या निर्णयावर ठाम होते व त्यांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं.
तर दुसरीकडे दक्षिण त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी सी.के. जमातिया यांनी सांगितले की, जर कुणी कोणाच्याही धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असताना आढळले तर प्रशासन संबंधितांविरोधात कारवाई करू शकतो.  दरम्यान, त्रिपुरात ईद पूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं आहे. 
 
पुढच्या वर्षी त्रिपुरामध्ये आहेत निवडणुका
त्रिपुरामध्ये भाजपाचा आत्तापर्यंत कधीही प्रभाव नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1977 पर्यंत त्रिपुरामध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यानंतर डाव्यांचा प्रभाव या राज्यावर राहिलेला आहे. काँग्रेस आघाडीचा काही वर्षांचा अपवाद वगळता त्रिपुरामध्ये 1977 नंतर डाव्या पक्षांनी सरकार स्थापन केले आहे. सध्याही त्रिपुरात सलग पाचव्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची सत्ता असून माणिक सरकार मुख्यमंत्री आहेत.
 
मात्र, नरेंद्र मोदींच्या विजयानंतर देशभरातली समीकरणे जशी बदलली, तसं त्रिपुरातलही बदलत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पंचायतीच्या निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते भाजपाचे 4 उमेदवार निवडून आले. तर आगरतळा महापालिकेत भाजपाला 14 टक्के मते मिळाली. प्रत्यक्षात जागा फार मिळाल्या नसल्या तरी भाजपाचा जनाधार गेल्या दोन वर्षांमध्ये त्रिपुरात वाढला आहे आणि पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असून भाजपा नक्कीच मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.
 
या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये त्रिपुरातील 200 मुस्लीम आकृष्ट होतात आणि त्यांना सत्ताधारी पक्ष मशिद प्रवेशाची बंदी घालतं हे उल्लेखनीय आहे. त्रिपुरामध्ये सुमारे 83.40 टक्के जनता हिंदू असून 8.40 टक्के मुस्लीम तर 4.35 टक्के ख्रिश्चन आहे.