शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लग्न ठरलं, पण वधू अडकली पाकिस्तानात !

By admin | Updated: October 7, 2016 13:02 IST

भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेल्यामुळे एका राजस्थानी तरुणाचं लग्न अर्ध्यावर लटकलं आहे. कारण त्याची वधू पाकिस्तानची असून व्हिसा मिळत नसल्याने लग्न होणार की नाही या संभ्रामवस्थेत दोन्ही कुटुंब पडली आहेत.
 
नरेश तिवानी असं या तरुणाचं नाव असून योग्य ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिला जात नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. 7 नोव्हेंबरला लग्न होणार असून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते का काय ? याची भीती वाटत असल्याचं नरेश तिवानी बोलला आहे. 
 
लग्नाची तारीख जवळ आली आहे, मात्र पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाने वधू आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिलेला नाही. व्हिसा न मिळाल्याने ठरलेल्या तारखेली लग्न होणार की नाही याची चिंता दोन्ही कुटुंबाना लागली आहे. भारतीय दूतावास व्हिसा देत नसून वारंवार फे-या मारायला लावत असल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी नरेश तिवानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदत मागितली आहे. 
 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती. 
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळलं. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली आहे. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याकडूनच दोन्ही कुटुंबांना अपेक्षा आहेत.