शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

लग्न ठरलं, पण वधू अडकली पाकिस्तानात !

By admin | Updated: October 7, 2016 13:02 IST

भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेल्यामुळे एका राजस्थानी तरुणाचं लग्न अर्ध्यावर लटकलं आहे. कारण त्याची वधू पाकिस्तानची असून व्हिसा मिळत नसल्याने लग्न होणार की नाही या संभ्रामवस्थेत दोन्ही कुटुंब पडली आहेत.
 
नरेश तिवानी असं या तरुणाचं नाव असून योग्य ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिला जात नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. 7 नोव्हेंबरला लग्न होणार असून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते का काय ? याची भीती वाटत असल्याचं नरेश तिवानी बोलला आहे. 
 
लग्नाची तारीख जवळ आली आहे, मात्र पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाने वधू आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिलेला नाही. व्हिसा न मिळाल्याने ठरलेल्या तारखेली लग्न होणार की नाही याची चिंता दोन्ही कुटुंबाना लागली आहे. भारतीय दूतावास व्हिसा देत नसून वारंवार फे-या मारायला लावत असल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी नरेश तिवानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदत मागितली आहे. 
 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती. 
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळलं. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली आहे. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याकडूनच दोन्ही कुटुंबांना अपेक्षा आहेत.