शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

लग्न ठरलं, पण वधू अडकली पाकिस्तानात !

By admin | Updated: October 7, 2016 13:02 IST

भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेल्यामुळे एका राजस्थानी तरुणाचं लग्न अर्ध्यावर लटकलं आहे. कारण त्याची वधू पाकिस्तानची असून व्हिसा मिळत नसल्याने लग्न होणार की नाही या संभ्रामवस्थेत दोन्ही कुटुंब पडली आहेत.
 
नरेश तिवानी असं या तरुणाचं नाव असून योग्य ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिला जात नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. 7 नोव्हेंबरला लग्न होणार असून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते का काय ? याची भीती वाटत असल्याचं नरेश तिवानी बोलला आहे. 
 
लग्नाची तारीख जवळ आली आहे, मात्र पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाने वधू आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिलेला नाही. व्हिसा न मिळाल्याने ठरलेल्या तारखेली लग्न होणार की नाही याची चिंता दोन्ही कुटुंबाना लागली आहे. भारतीय दूतावास व्हिसा देत नसून वारंवार फे-या मारायला लावत असल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी नरेश तिवानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदत मागितली आहे. 
 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती. 
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळलं. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली आहे. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याकडूनच दोन्ही कुटुंबांना अपेक्षा आहेत.