शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

लग्न ठरलं, पण वधू अडकली पाकिस्तानात !

By admin | Updated: October 7, 2016 13:02 IST

भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेल्यामुळे एका राजस्थानी तरुणाचं लग्न अर्ध्यावर लटकलं आहे. कारण त्याची वधू पाकिस्तानची असून व्हिसा मिळत नसल्याने लग्न होणार की नाही या संभ्रामवस्थेत दोन्ही कुटुंब पडली आहेत.
 
नरेश तिवानी असं या तरुणाचं नाव असून योग्य ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिला जात नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. 7 नोव्हेंबरला लग्न होणार असून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते का काय ? याची भीती वाटत असल्याचं नरेश तिवानी बोलला आहे. 
 
लग्नाची तारीख जवळ आली आहे, मात्र पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाने वधू आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिलेला नाही. व्हिसा न मिळाल्याने ठरलेल्या तारखेली लग्न होणार की नाही याची चिंता दोन्ही कुटुंबाना लागली आहे. भारतीय दूतावास व्हिसा देत नसून वारंवार फे-या मारायला लावत असल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी नरेश तिवानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदत मागितली आहे. 
 
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती. 
 
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळलं. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली आहे. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याकडूनच दोन्ही कुटुंबांना अपेक्षा आहेत.