शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विवाहितांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त

By admin | Updated: August 21, 2015 22:29 IST

भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या

इंदूर : भारतीय कु टुंबांमध्ये सातत्याने कमी होत चाललेली व्यक्तिगत सहनशीलता आणि वैवाहिक जीवनातील वाढता ताणतणाव यामुळे देशात अविवाहितांच्या तुलनेत विवाहितांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) एका अहवालात ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार इ.स.२०१४ साली आत्महत्या करणाऱ्या एकूण लोकांपैकी ६५.९ टक्के विवाहित होते, तर २१.१ टक्के आत्महत्याग्रस्तांचे लग्न झाले नव्हते. आत्महत्या करणारे १.४ टक्के लोक घटस्फोटित अथवा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभय जैन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही आकडेवारी भारतीय कुटुंब व्यवस्थेतील गंभीर बदलाचे संकेत देत असल्याचे स्पष्ट केले. विवाहितांमधील वाढत्या आत्महत्यांची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, देशात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत असून विभक्त कुटुंबांकडे अधिक कल आहे. यामुळे कुटुंबातील संघर्ष वाढत असून व्यक्तिगत सहनशीलता सातत्याने कमी होत आहे. विभक्त कुटुंबात राहणारे दाम्पत्य आपल्या व्यावसायिक आणि खासगी समस्यांबद्दल एकमेकांसोबत मनमोकळी चर्चा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एकट्याने समस्यांना तोंड देत असल्याने ते नैराश्यग्रस्त होत आहेत आणि शेवटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. (वृत्तसंस्था)