शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सप्तपदीविना हिंदूंचा विवाह वैधच

By admin | Updated: November 12, 2015 00:12 IST

सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

चेन्नई : भटजीचे मंत्रपठण, लाजाहोम, सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ (आत्मसन्मान) विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.तामिळनाडू सरकारने हिंदू विवाह कायद्यात ७ ए हे नवे कलम अंतर्भूत करून ‘स्वयंमर्यादा’ या सरळ, सोप्या पद्धतीने विवाह करण्याची सोय केली. या कायद्याच्या वैधतेस आव्हान देणारी अ‍ॅड. ए. असुवथमन यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश न्या. संजय किशन कौल व न्या. टी. एस. शिवाग्ननन यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘मुळात हिंदू धर्म विविधांगी असून त्यात त्या त्या प्रदेशानुसार व रीतिभातींप्रमाणे विवाह करण्याच्या अनेक पद्धती परंपरेने रूढ झालेल्या आहेत. तामिळनाडू सरकारने कायदा दुरुस्ती करून अशाच एका सोप्या पद्धतीने विवाह करण्याची सोय हिंदूंना करून दिली आहे. शिवाय राज्यात ‘स्वयंमर्यादा’ पद्धतीने लावलेले विवाह गेली पाच दशके काळाच्या कसोटीवर उतरले आहेत, असेही खंडपीठाने नमूद केले.या कायद्याच्या वैधतेस आव्हान देताना कायदेशीर मुद्द्यांखेरीज याचिकाकर्त्यांचा असाही आक्षेप होता की, एका ठराविक राजकीय चळवळीची विचारसरणी पुढे रेटण्यासाठी हा कायदा केला गेला आहे. पण यावर टीका करताना न्यायालयाने म्हटले की, जणू काही देशात सध्या फूटपाडू मुद्द्यांची वानवा आहे म्हणून या याचिकेने असाच एक मुद्दा समोर आणण्याचा हेतू साध्य केला आहे. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने गृहस्थाश्रम स्वीकारणे हे हिंदू विवाह पद्धतीमधील पारंपरिक धार्मिक विधी आहेत. तामिळनाडू सरकारच्या कायद्याने या विधींना फाटा दिल्याने तो घटनाबाह्य ठरवावा, असा अ‍ॅड. असुवथमन यांचा आग्रह होता; परंतु न्यायालयाने म्हटले की, व्यक्तिगत कायद्याशी संबंधित अशा बाबींमध्ये विवाह करण्याच्या पद्धतीत दिले गेलेले पर्याय राज्यघटनेनुसार कसे निषिद्ध ठरतात हे याचिकाकर्त्यांनी दाखविलेले नाही. विधिमंडळाने केलेला कायदा वैधच असतो. ते खोडून काढण्यासारखे याचिकेत आम्हाला काही दिसत नाही.न्यायालयाने म्हटले की, वैध हिंदू विवाहासाठी पुरोहिताच्या साक्षीनेच करण्याची गरज नाही, हा या कायदा दुरुस्तीचा मुख्य गाभा आहे. वधू-वरांच्या नातेवाईकांची व मित्रमंडळींची विवाहास उपस्थिती असणे पुरेसे आहे. दोघांनीही पती/पत्नी म्हणून परस्परांचा स्वीकार केल्याचे सुस्पष्ट शब्दांत उच्चारण करणे व त्यानंतर त्यांनी एकमेकांना हार घालणे किंवा एक दुसऱ्याच्या कोणत्याही बोटात अंगठी घालणे या गोष्टी पुरेशा आहेत. हिंदू वैदिक संस्कृतीचे जोखड झुगारून देण्यासाठी ईव्हीआर पेरियार यांनी १९२५ मध्ये तामिळनाडूत प्रखर द्राविडी चळवळ उभारली. याच चळवळीतून द्रविड मुन्नेत्र कझगम हा राजकीय पक्ष उदयाला आला व १९६७ मध्ये सी. एन. अण्णादुराई या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री झाले. अण्णादुराई यांनी सत्तेवर येताच पहिला निर्णय ‘स्वयंमर्यादा’ विवाहांचा घेतला व त्याच्या पुढच्याच वर्षी अशा विवाहांना वैधानिक अधिष्ठान देणारा कायदा केला गेला.