शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

पावसासाठी दोन मुलांचे लावले जाते लग्न

By admin | Updated: March 6, 2017 04:48 IST

पाऊस पडावा, यासाठी लोक काय करीत नाहीत? कुठे पूजाअर्चा होते, तर कुठे यज्ञ केले जातात

नवी दिल्ली : पाऊस पडावा, यासाठी लोक काय करीत नाहीत? कुठे पूजाअर्चा होते, तर कुठे यज्ञ केले जातात. काही ठिकाणी तर बेडकांचे लग्न लावले जाते. मात्र, बंगळुरूच्या ग्रामीण भागात वरुणराजाचे आगमन व्हावे यासाठी मुलांचे एकमेकांशी लग्न लावतात. वरुणराजाची करुणा भाकण्यासाठी लावण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या विवाहात एका मुलाने वराचा पोशाख घातला होता, तर दुसरा मुलगा वधूच्या वेशात होता. मग त्यांचे लग्न लावण्यात आले. हा विवाह पुरेसा पाऊस पडावा म्हणून करण्यात आलेल्या पूजेचा एक भाग आहे. या विवाहामुळे संपूर्ण भागात पाऊस पडून भरपूर धनधान्य पिकेल, असे गावकरी मानतात. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजन करण्यात आले. मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक लोक उपस्थित होते. विवाहासाठी गावात वर्गणी गोळा करण्यात आली. त्यानंतर विवाह सोहळ्याचे आयोजन झाले. त्याचबरोबर लोकांना या विवाहाचे निमंत्रण देण्यात आले. स्थानिक लोक या विवाहाला आपल्या परंपरेचा भाग मानतात. मुलांचे लग्न ही येथील ‘हाराके’ परंपरा असून, संपूर्ण भागात संपन्नता आणि समृद्धी यावी यासाठी या पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेसाठी दोन मुलांची निवड करून नंतर त्यांचे लग्न लावले जाते, असे एका ग्रामस्थाने सांगितले.