शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाच वर्षाच्या मुलीचे ‘शिक्षा’ म्हणून होणारे लग्न आईने रोखले

By admin | Updated: April 17, 2017 02:03 IST

मध्य प्रदेशमधील गुना जिल्हा प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून पाच वर्षाच्या मुलीचा एका अल्पवयीन मुलासोबत होऊ घातलेला विवाह रोखला आहे

भोपाळ: मध्य प्रदेशमधील गुना जिल्हा प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून पाच वर्षाच्या मुलीचा एका अल्पवयीन मुलासोबत होऊ घातलेला विवाह रोखला आहे. गुणा जिल्ह्याच्या आरों मंडलातील तारपूर गावातील जात पंचायतीने ‘शिक्षा’ म्हणून या मुलीचे लग्न लावून देण्याचा आदेश दिला होता. या मुलीचे वडील जगदीश बंजारा यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या एका वासराला हाकलण्यासाठी त्याच्या दिशेने दगड भिरकावला. तो दगड वर्मी लागून ते वासरू मेले होते. वासरू ज्याचे होते त्याने जात पंचायतीकडे फिर्याद नेली.आदिवासी जमातीच्या या पंचायतीने जगदीश याने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीचे लग्न लावून द्यावे, अशा शिक्षेचे फर्मान काढले.जगदीशने टाळाटाळ सुरु केल्यावर गावकऱ्यांनी त्याला गंगास्नान करून यायला लावले, मंदिरांमध्ये पूजा करायला लावल्या व गावजेवणही घालायला लावले. तरीही तो ऐकेना तेव्हा त्याने शिक्षा पूर्ण केल्याखेरीज त्याच्या इतर मुलींशी गावातील कोणीही मुलगा लग्न करणार नाही, अशी धमकी देण्यात आली. त्याच्या कुटुंबाला वाळित टाकण्यात आले. शेवटी विदिशा जिल्ह्यातील एका मुलाशी त्याने मुलीचे लग्न लावून द्यावे, असे फर्मान गाव पंचायतीने काढले. जगदीशची पत्नी पुष्पा हिने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आणि हा अघोरी शिक्षेचा प्रकार उघडकीस आला. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नियाज अहमद खान यांनी सांगितले की, प्रशासनाने लगेच हस्तक्षेप करून मुला-मुलीचे वडील व पंचायत सदस्य यांच्याकडून प्रत्येकी २० हजार रुपयांचा बॉण्ड लिहून घेतला व त्याचे उल्लंघन करून लग्न लावले गेले तर सर्वांना तुरुंगात टाकण्याची ताकीद दिली. जगदीशच्या कुटुंबावरील बहिष्कार सुरु ठेवला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी गावकऱ्यांनाही देण्यात आली. गावातील आंगणवाणी सेविका आणि स्थानिक पोलिसांनाही गावातील हालचालींकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.