शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस मराठवाड्याला पावला !

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

जोरदार हजेरी : वीज पडून तीन ठारऔरंगाबाद : संपूर्ण हंगामात मराठवाड्यावर रुसलेला पाऊस अखेर परतीच्या वेळी पावला. औरंगाबाद वगळता विभागातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून सोमवारी ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. बीडमध्येही रिमझिम ...


जोरदार हजेरी : वीज पडून तीन ठार

औरंगाबाद : संपूर्ण हंगामात मराठवाड्यावर रुसलेला पाऊस अखेर परतीच्या वेळी पावला. औरंगाबाद वगळता विभागातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून सोमवारी ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. बीडमध्येही रिमझिम पावसाला रात्री आठनंतर सुरुवात झाली होती. आष्टी, अंबाजोगाई, सिरसाळा, माजलगाव व तालखेड परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसाची एकूण सरासरी ७.८ मिमी एवढी नोंद झाली आहे. जालना शहरातही रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली.
नांदेड, कंधार, लोहा, अर्धापूर, बरबडा, उमरी परिसरातील मुगट, पाथरड, निवघा बाजार शिवारातही पाऊस झाला़ भोकर येथे एक तास विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ हिंगोली तालुक्यातही सोमवारी पाऊस झाला. औंढा नागनाथ, हिंगोली, वसमत, कळमनुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दोन महिन्यांच्या खंडानंतर परभणी, गंगाखेड या दोन तालुक्यांत पाऊस झाला़ गत तीन दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे़ (प्रतिनिधी)
---------------
वीज पडून वेगवेगळ्या घटनांत तीन जण ठार झाले. कंधारमधील बाचोटी येथे वीज पडून दिगांबर महाजन म्हैत्रे (२४) यांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात राहूल विश्वंभर जाधव (२५), कमल धनराज राठोड (३५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर प्रियंका राठोड (१४) ही मुलगी जखमी झाली.