शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत अनेक दिग्गज बेघर होणार

By admin | Updated: May 19, 2014 03:30 IST

अनेक प्रमुख नेत्यांना १६व्या लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागल्याने त्यांना देशाच्या राजधानीत वास्तव्यापासून अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.

फराज अहमद, नवी दिल्ली - अनेक प्रमुख नेत्यांना १६व्या लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागल्याने त्यांना देशाच्या राजधानीत वास्तव्यापासून अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. त्यातील बहुतांश नेते दिल्लीत कायम वास्तव्यास आहेत. माजी रेल्वेमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्यावर घर देता का घर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रांचीच्या न्यायालयाने पशुखाद्य घोटाळ्याबाबत दोषी ठरविल्याने लालूप्रसाद यादव यांना निवडणूक लढविता आली नाही. त्यांनी पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मिसा यांना उभे केले; पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यामुळे त्यांना २५ तुघलक रोड येथील बंगला लवकरच रिकामा करावा लागेल. मोदी सरकार त्यांच्यावर दया दाखविण्याची शक्यता कमीच आहे. राजदचे चार उमेदवार निवडून आले. त्यातील बुलो मंडल हे पहिल्यांदाच खासदार बनल्याने त्यांना बंगला मिळणार नाही. तसलीमुद्दीन आणि पप्पू यादव यांच्याशी लालूप्रसाद यांचे फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. हे दोघेही याआधी केवळ राज्यमंत्री राहिले असल्याने ते टाईप आठ बंगल्यासाठी पात्रही ठरणार नाहीत. लालूंचे एकेकाळचे गुरू संयुक्त जदचे अध्यक्ष शरद यादव हेसुद्धा एकाच नावेतील प्रवासी आहेत. ते जबलपूरच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. ते १९७४पासून दिल्लीत राहतात. केवळ १३ महिने चाललेली १२वी लोकसभा वगळता ते सातत्याने लोकसभेवर निवडून आले होते. १५व्या लोकसभेत जेडीयूचे २० खासदार होते. त्या वेळी शरद यादव यांच्यासह केवळ आठ जणांना बंगले मिळाले होते. या सर्वांना आता ते रिकामे करावे लागतील. समाजवादी पक्षाचे २१ खासदार होते. आता केवळ दोन आहेत. जयाप्रदा आणि कुंवर रेवतीरमण सिंग यांना बंगले मिळाले होते. या पक्षाचे बहुतांश खासदार साऊथ आणि नॉर्थ एव्हेन्यूवरील फ्लॅट्समध्ये राहतात.