शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

नेहरूंच्या त्यागाचा अनेकांना विसर - वरूण गांधींचा मोदींवर निशाणा

By admin | Updated: September 3, 2016 11:57 IST

पंडित नेहरू १५ वर्ष तुरूंगात होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो असा शब्दांत वरूण गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ३ - पंडित नेहरू श्रीमंत घराण्यातील होते आणि त्यांना सहजपण भारताचे पंतप्रधानपद मिळाले, असं अनेकांना वाटतं. पण नेहरू १५ वर्ष तुरूंगात राहिले होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो, अशी जाणीव करून देताना भाजपा नेते वरूण गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रतक्षपण निशाणा साधला. ते शुक्रवारी लखनऊ येथील युवा संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच केंद्र सरकारची धोरणे  व पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपण टीका केली. 
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींच्या विधानांमधून त्यांची नाराजी दिसत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. ' पंडित नेहरू अगदी सहजपणे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, त्यांची जीवनशैली ऐषोआरामी आणि राजासारखी होती, असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्याच पंडित नेहरूंनी तब्बल पंधरा वर्षे तुरूंगात काढली, याचाच अनेकांना विसर पडतो' अशा शब्दांत वरूण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ' मला आज जर कुणी म्हणालं, १५ वर्षं तुरूंगात राहा आणि त्यानंतर तुला पंतप्रधानपद देतो, तर मी तो प्रस्ताव कधीच स्वीकारणार नाही. १५ वर्षांच्या काळात माणसाच्या जीवनात खूप मोठा फरक पडतो, त्याचा जीवही जाऊ शकतो,'  असेही वरूण यांनी आपल्या भाषणात म्हटले.  तसेच ' आयुष्यात वेगाने पुढे जायचे असेल तर एकटे जा, पण दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा,'  हे नेल्सन मंडेला यांचे वचनही उधृत करत त्यांनी मोदींच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.