शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंच्या त्यागाचा अनेकांना विसर - वरूण गांधींचा मोदींवर निशाणा

By admin | Updated: September 3, 2016 11:57 IST

पंडित नेहरू १५ वर्ष तुरूंगात होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो असा शब्दांत वरूण गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ३ - पंडित नेहरू श्रीमंत घराण्यातील होते आणि त्यांना सहजपण भारताचे पंतप्रधानपद मिळाले, असं अनेकांना वाटतं. पण नेहरू १५ वर्ष तुरूंगात राहिले होते, त्यांनी केलेल्या त्यागाचा अनेकांना विसर पडतो, अशी जाणीव करून देताना भाजपा नेते वरूण गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रतक्षपण निशाणा साधला. ते शुक्रवारी लखनऊ येथील युवा संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच केंद्र सरकारची धोरणे  व पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपण टीका केली. 
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींच्या विधानांमधून त्यांची नाराजी दिसत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. ' पंडित नेहरू अगदी सहजपणे भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, त्यांची जीवनशैली ऐषोआरामी आणि राजासारखी होती, असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्याच पंडित नेहरूंनी तब्बल पंधरा वर्षे तुरूंगात काढली, याचाच अनेकांना विसर पडतो' अशा शब्दांत वरूण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ' मला आज जर कुणी म्हणालं, १५ वर्षं तुरूंगात राहा आणि त्यानंतर तुला पंतप्रधानपद देतो, तर मी तो प्रस्ताव कधीच स्वीकारणार नाही. १५ वर्षांच्या काळात माणसाच्या जीवनात खूप मोठा फरक पडतो, त्याचा जीवही जाऊ शकतो,'  असेही वरूण यांनी आपल्या भाषणात म्हटले.  तसेच ' आयुष्यात वेगाने पुढे जायचे असेल तर एकटे जा, पण दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा,'  हे नेल्सन मंडेला यांचे वचनही उधृत करत त्यांनी मोदींच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.