शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मनमोहनसिंग यांच्यावरील कोळसा खटला ‘थंड बस्त्यात!’

By admin | Updated: April 10, 2015 09:07 IST

ओडिशातील तालिबिरा-२ कोळसा खाणपट्ट्याचे हिंदाल्को कंपनीस कथित बेकायदा वाटप केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग,

नवी दिल्ली : ओडिशातील तालिबिरा-२ कोळसा खाणपट्ट्याचे हिंदाल्को कंपनीस कथित बेकायदा वाटप केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी. पारेख यांच्यासह सहा आरोपींवर दाखल झालेला फौैजदारी खटला पुढील किमान तीन वर्षे ‘थंड बस्त्यात’ पडून राहण्याची चिन्हे आहेत.विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्यात या सर्वांना आरोपी करून त्यांच्याविरुद्ध समन्स काढले होते; परंतु या सहाही आरोपींनी याविरुद्ध विशेष अनुमती याचिका दाखल करून घेताना सर्वोच्च न्यायालयाने केवळ समन्सलाच नव्हे, तर विशेष न्यायालयापुढील खटल्यासही स्थगिती दिली. ही स्थगिती किमान ३ वर्षे लागू राहील व त्यामुळे डॉ. सिंग यांच्यासह कोणाही आरोपीस तोपर्यंत या खटल्यास सामोरे जावे लागणार नाही.सर्वोच्च न्यायालयात थेट अपील करता येत नाही. त्यासाठी अपील करण्याची अनुमती करण्याची याचिका (स्पेशल लिव्ह पिटिशन-एसएलपी) करावी लागते. ज्यात कायद्याचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे व ज्यावर सविस्तर सुनावणी होणे गरजेचे आहे, असे न्यायालयास प्रथमदर्शनी वाटते, अशा प्रकरणात न्यायालय अनुमती देते. डॉ. सिंग व इतरांच्या याचिकाही न्या. व्ही. गोपाळ गौडा व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने अशाच प्रकारे अपील म्हणून दाखल करून घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रचलित नियमांनुसार अशा प्रकारे दाखल करून घेतलेल्या अपिलांवर क्रमवार सुनावणी घेतली जाते. त्यानुसार सध्या न्यायालय वर्ष २००९-१० मध्ये दाखल करून घेतलेल्या अपिलांवर अंतिम सुनावणी करीत आहे. अपवादात्मक निकड असल्याखेरीज न्यायालय क्रम सोडून सुनावणी घेत नाही. अगदी ज्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे, अशी अपिलेही क्रम सोडून लवकर सुनावणी घेण्यास न्यायालयाने याआधी नकार दिला आहे. दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार खटल्यातील अपिले हे याचे ताजे उदाहरण आहे.त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग यांच्या अपिलावर क्रम सोडून लवकर सुनावणी होण्याची शक्यता नाही. नाही म्हणायला अपिलांची सुनावणी लवकर व्हावी व त्यांच्या प्रलंबनाचा काळ पाच वर्षांवरून किमान तीन-चार वर्षांवर यावा यासाठी सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू विशेष भर देत आहेत. त्यात यश आले तरी क्रमवारीनुसार डॉ. सिंग यांचे अपील २०१८ च्या आधी अंतिम सुनावणीसाठी येण्याची शक्यता नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)