शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरचे अपूर्ण विकास कार्य दिल्लीत बसून पूर्ण करणार

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

मणिपूरचे अपूर्ण विकास कार्य

मणिपूरचे अपूर्ण विकास कार्य
दिल्लीत बसून पूर्ण करणार
जोरदार स्वागत : मोदींनी जाहीर सभेत घेतला निरोप
नंदकिशोर पुरोहित/मणिनगर : मणिनगरच्या विकासाचे स्वप्न मी आणि येथील जनतेने एकत्रितरीत्या बघितले आहे. काही काम झाले, काही काम बाकी आहे. यापुढे मणिनगरचे अपूर्ण विकास कार्य दिल्लीत बसून पूर्ण करणार, अशी ग्वाही पंतप्रधान नियुक्त नरेंद्र मोदी यांनी निरोपाच्या सभेत दिली. मोदींना निरोप देण्यासाठी मणिनगरवासीयांनी एकच गर्दी केली होती. ‘मोदी मोदी’च्या नार्‍यांनी आसमंत दुमदुमला होता.
पक्ष कार्यालयात जाऊन लोकांना भेटण्याच्या तयारीने आलो होतो. येथील विशाल जनसमुदाय प्रतीक्षा करीत असल्याचे बघून बोलतो आहे, असे ते म्हणाले. रात्री 8 वाजून 7 मिनिटांनी मोदींचे सभास्थळी आगमन झाले तेव्हा गायक योगेश गढवी आणि त्यांचे सहकारी ‘भारत माता की जय’चे नारे देण्याचे आवाहन करीत होते. मात्र मोदी व्यासपीठावर येताच त्यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. बुथस्तरावरील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. मी मणिनगरची जनता आणि मोदींदरम्यान भिंत बनणार नाही, एवढे बोलून अमित शाह यांनी भाषण संपवले. लोकांची ताणली गेलेली उत्सुकता हे त्यामागचे कारण होते.
सप्टेंबरपासून देशभर भाषणांची मालिका कायम ठेवणार्‍या मोदींनी विधानसभेचे प्रतिनिधी या नात्याने अखेरचे भाषण करताना स्थानिक जनतेचे आभार मानले. 2012 मध्ये विधानसभेत निवडून आल्यानंतर मणिनगरमध्ये झालेल्या पहिल्या सभेतही ‘मोदी पीएम, मोदी पीएम’ हे नारे लागले होते. त्यावेळी मी आमदार होतो. तथापि, जनताजनार्दनाने मला पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दाखविले. जनतेसमोर कुणाचे चालणार? म्हणून माझे चालेल? असे म्हणत त्यांनी भावनिक साद घातली. 2015 मध्ये मणिनगरच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल त्यांनी शताब्दी वर्ष विकासपर्व म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले.
अमित शाह यांची प्रशंसा..
आपले खास विश्वासू अमित शाह यांची प्रशंसा करताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘गुजराती देश के किसी भी कोने में जाएगा, सफलता के झंडे गाड़कर ही लौटेगा’ असे उद्गार त्यांनी काढले. शाह यांनी उत्तर प्रदेशात भाजपला मिळवून दिलेले यश पाहता काँग्रेसला संपूर्ण देशातही तेवढय़ा जागा मिळविता आल्या नाही, असे ते म्हणाले.
आतषबाजीने उजळले आकाश..
मोदींच्या भाषणानंतर भाजपने केलेल्या नेत्रदीपक आतषबाजीने आकाश उजळून निघाले. तिरंगी फुगे सोडण्यात आले तेव्हा मोदींच्या नावाचा जयजयकार सुरू होता. मणिनगरचा तारा दिल्लीत चमकणार, अशी सदिच्छा देत लोक निरोप घेत होते.