शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मनुचा व्हायला हवा ‘मेकओव्हर’!

By admin | Updated: May 11, 2017 03:25 IST

‘विनाकारण’ बदनाम केल्या केलेल्या मनुविषयीचे जनतेच्या मनातील भ्रम दूर करून, ‘मनुचा मेकओव्हर’ करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंग असलेल्या ‘संस्कार भारती’ने केला असून

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विनाकारण’ बदनाम केल्या केलेल्या मनुविषयीचे जनतेच्या मनातील भ्रम दूर करून, ‘मनुचा मेकओव्हर’ करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंग असलेल्या ‘संस्कार भारती’ने केला असून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयानेही तज्ज्ञ इतिहासकारांकरवी संशोधन करून सत्य जगासमोर आणावे, असा त्यांचा आग्रह आहे.संस्कार भारतीच सहसंघटनमंत्री अमीरचंद या संदर्भात म्हणतात की, ‘मनुस्मृती’च्या निमित्ताने टीकेची झोड उठवून मनुला बदनाम करण्याचा एकतर्फी प्रयोग भारतातातील विविध राजकीय पक्षांनी आजवर केला आहे. मनुवर होणारी ही टीका अर्धवट माहिती व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे होत आहे. त्यामुळे मनुची उजळ बाजू समोर आणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे ‘मेकओव्हर’ व्हायला हवे, असे आमचे म्हणणे आहे. मनुस्मृती व वेदांमधील काही संकल्पनांंबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठीही संशोधन करून सत्य जगासमोर आणणे गरजेचे आहे, असे अमीरचंद म्हणाले.मनुस्मृतीचा कालखंड आजपासून १८00 ते २४00 वर्षे जुना आहे तर मनुचा जन्म ८000 वर्षांपूर्वी झाल्याचे बहुतांश इतिहासतज्ज्ञ मानतात असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, मनुच्या जन्मानंतर तब्बल ५ हजार वर्षांनी अस्तित्वात आलेल्या मनुस्मृतीवरील टीकेचे खापर मनुवर फोडणे सर्वथा अयोग्य व अन्यायकारक आहे.मनुच्या इतिहासकालिन व्यक्तिमत्वाबरोबरच वेदांमधील काही संकल्पनांबाबतही जनतेत भ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांमार्फत केला जाता, असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, भारतीय संस्कृतीच्या मूलतत्वांकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्यात सुधारणा घडवण्याचे व हा भ्रम दूर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासंवाद, इतिहासकालिन विषयांवर कार्यशाळा, व व्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. संस्कार भारतीतर्फे ही मागणीही केंद्र सरकारकडे केली जाईल.