शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

...तर मुस्लिमांसाठी नवा कायदा करू- केंद्र सरकार

By admin | Updated: May 15, 2017 16:22 IST

मुस्लिमांच्या तोंडी तलाक या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी आणल्यास केंद्र सरकार मुस्लिमांसाठी नवा कायदा करेल

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 15- मुस्लिमांच्या तोंडी तलाक या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी आणल्यास केंद्र सरकार मुस्लिमांसाठी नवा कायदा करेल, असे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयातील तोंडी तलाक प्रकरणावरच्या सुनावणीदरम्यान रोहतगी यांनी तोंडी तलाकबद्दलची केंद्र सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट केली. मुस्लिमांच्या तोंडी तलाक या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यास केंद्र सरकार मुस्लिमांमधील लग्न आणि घटस्फोटांसंबंधी नवा कायदा करेल, असे अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाला सांगितले आहे. तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याचेही रोहतगी म्हणाले आहेत. वेळ अपुरी असल्यामुळे फक्त तोंडी तलाकवरच सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केले होते. तोंडी तलाकसंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्वाचा विचार केला जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. मात्र केंद्राच्या प्रतिनिधींनी आज झालेल्या सुनावणीत निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यांचादेखील समावेश केला. न्यायालयाकडे वेळ अपुरी असल्याने एकाच वेळी तिन्ही मुद्द्यांवर सुनावणी घेता येणार नाही. भविष्यात निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्व मुद्द्यांवर सुनावणी घेऊ, असेही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून तोंडी तलाकच्या मुद्द्यावर विशेष सुनावणी घेतली जात असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुट्टीच्या कालावधीतही कामकाज पाहत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या या खंडपीठात पाच धर्मांच्या पाच न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी झाली आहे.