शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या मुर्त्या बनवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: August 28, 2016 11:42 IST

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.  आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का बनवत नाही ? मातीच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे असे मोदींनी सांगितले. 
 
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि मराठ मोळया ललिता बाबरचे कौतुक केले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून आपण कोणापेक्षा कमी नाही हे मुलींनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले असे मोदींनी सांगितले.  
 
क्रीडा क्षेत्रात आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, खेळांना प्रोत्साहनाची गरज आहे आणि हे काम जनताच उत्तम करु शकते असे ते म्हणाले. रौप्यपदक विजेत्या सिंधूचे प्रशिक्षक गोपीचंद यांचेही मोदींनी कौतुक केले. पुलेला गोपीचंद यांची खेळासाठी जी साधना आहे, समर्पण आहे त्याला मी सलाम करतो. ते उत्तम शिक्षक आहेत असे मोदी म्हणाले. 
 
मन की बात मधील मुद्दे
- स्वच्छ गंगा आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
 
- शेजा-यांबरोबर आपले संबंध मैत्रीपूर्ण असले पाहिजेत.
 
- छत्तीसगडमध्ये १७०० पेक्षा जास्त शाळांमधील मुलांनी आपल्या पालकांना चिठ्ठी लिहून घरात शौचालय बांधण्याची मागणी केली.
 
- गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले.
 
- मराठमोळया ललिता बाबरचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.
 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पूर्यावरणपूरक इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.
 
- पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे.
 
- मातीच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.
 
- आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का बनवत नाही ?.
 
- पुलेला गोपीचंद यांची खेळासाठी जी साधना आहे, समर्पण आहे त्याला मी सलाम करतो.
 
- आपल्या आयुष्यात आई इतकेत शिक्षक महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आपले आयुष्य घालवतात .
 
- पाच सप्टेंबर माझ्यासाठी फक्त शिक्षक दिन नसतो तर, तो शिकण्याचाही दिवस असतो.
 
- पंतप्रधान मोदींनी साक्षी मलिक, पीव्हीसिंधू आणि दीपा कर्माकरच 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना कौतुक केलं.
 
- क्रीडा क्षेत्रात आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, खेळांना प्रोत्साहनाची गरज आहे आणि हे काम जनताच उत्तम करु शकते.
 
- पंतप्रधान 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत.
 
-  रिओ ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवली, आपण कोणापेक्षा कमी नाही हे मुलींनी पुन्हा एकदा सिद्ध केले.