शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सुखोई अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा

By admin | Updated: July 8, 2017 01:01 IST

भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

तिरुअनंतपुरम : भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, आपल्या मुलाच्या मृत्यूविषयी त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. फ्लाइट लेफ्टनंट अचुदेव आणि स्क्वॉड्रन लीडर डी. पंकज असलेल्या सुखोई विमानाला २३ मे रोजी भारत-चीन सीमेवर अपघात झाला होता. तीन दिवसांनंतर विमानाचे अवशेष आढळून आले. त्यानंतर दोन्ही शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, आपल्या घरी आलेल्या शवपेटीत त्यांच्या मुलाचे पार्थिव नव्हते. असा संशय व्यक्त केला आहे. दुर्घटनेत होरपळल्याने अचुदेव यांची ओळख करणे कठीण होते. त्यांच्या पार्थिवापाशी सैन्याला जे पाकीट मिळाले त्याआधारे अचुदेव यांची ओळख पटवण्यात आली, असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र माझ्या मुलाची ओळख पटवणे अशक्य असेल, तर त्याच्या पाकिटातील रोख रक्कम व बँक कार्ड कसे व्यवस्थित राहिले, असा प्रश्न अचुदेवच्या वडिलांनी केला आहे. मृत्यूची सांगण्यात आलेली कारणे आणि देण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये तफावत आहे. या घटनेमागे कोणती तरी दुसरीच गोष्ट दिसत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)कधी कोसळले?वायुसेनेने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान व वायुसेनेच्या प्रमुखांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बेपत्ता सुखोई एसयू ३0 जेट फायटरला २३ मे रोजी अपघात झाला होता. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले होते. हे विमान चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून आसाममधून बेपत्ता झाले होते. नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले होते.