शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

विधानसभेत बहुमत सिद्ध करेन, पन्नीरसेल्वम यांचे बंड

By admin | Updated: February 8, 2017 12:15 IST

तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

 ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 8 - तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुकमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.  ओ. पन्नीरसेल्वम यांनी शशीकला यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. मंगळवारपासून येथील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत.
 
'पक्षातील कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केल्यास राज्यपालांची भेट घेऊन आपण दिलेला राजीनामा मागे घेऊ. शिवाय, भाजपाच्या इशा-यांवरुन काहीही करत नसून, आपण पक्षाचा कधीही विश्वासघात केला नाही', असे पन्नीरसेल्वम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
एकीकडे स्पष्टीकरण देत असताना पन्नीरसेल्वम यांनी 'विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करुन दाखवेन', असे सांगत शशीकला यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. 'जनता मला पसंत करते आणि दबावाखाली येऊन राजीनामा दिला', असेही यावेळी पन्नीरसेल्वम म्हणाले.  
 
यावेळी, पन्नीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या मृत्यूचा मुद्दाही उपस्थित करत शशिकला यांच्यावर हल्लाबोल चढवला. जयललिता 75 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या, यादरम्यान मला त्यांची भेटही घेऊ दिली आहे, असा गौप्यस्फोट करत जयललितांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती, पन्नीरसेल्वम यांनी दिली.
 
अम्मांनी (जयललिता) जवळपास 16 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळले. मी दोन वेळा मुख्यमंत्री बनलो, हे सर्व काही अम्मा यांच्या इच्छेमुळे झाले. मी नेहमीच अम्मांच्या मार्गाचे अनुसरण केले आहे, असेही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.