शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

प्रमुख धरणे आटली; देश पाणीटंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: August 27, 2015 04:29 IST

पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने

नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे साहजिकच यंदा पाणीसंकट गहिरे होऊ शकते. पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी आगामी काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख धरण क्षेत्रात सध्या ९१ अब्ज घनमीटर पाणीसाठा असून तो वापरण्यायोग्य साठ्याच्या केवळ ५८ टक्के आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०३.५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता, तर गेल्या १० वर्षांतील सरासरी ९८.७ अब्ज घनमीटरपेक्षाही यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येऊ शकते.उत्तर व मध्य भारत वगळता देशातील जलाशयांतील पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. पश्चिम भारतातील २७ प्रकल्पांमध्ये (महाराष्ट्र व गुजरात) १५.८९ अब्ज घन मीटर (५९ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या ६१ टक्के साठ्याच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक आहे, असे म्हणता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्रात गंभीर स्थिती, धरणात ५ टक्केच साठाराज्यातील १७ मोठ्या जलाशयांपैकी १३ प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा आहे. जायकवाडी, भीमा, येलदरी, गिरणा धरणांत तर केवळ ५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.पूर्व भाग अडचणीतझारखंड, ओडिशा, प. बंगाल व त्रिपुरा या पूर्वेतील राज्यांतही दशकातील सरासरीपेक्षा कमी जलसाठा आहे. महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात जलशयांतील पाणी पातळी घसरली आहे.