शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रमुख धरणे आटली; देश पाणीटंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: August 27, 2015 04:29 IST

पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने

नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे साहजिकच यंदा पाणीसंकट गहिरे होऊ शकते. पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी आगामी काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख धरण क्षेत्रात सध्या ९१ अब्ज घनमीटर पाणीसाठा असून तो वापरण्यायोग्य साठ्याच्या केवळ ५८ टक्के आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०३.५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता, तर गेल्या १० वर्षांतील सरासरी ९८.७ अब्ज घनमीटरपेक्षाही यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येऊ शकते.उत्तर व मध्य भारत वगळता देशातील जलाशयांतील पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. पश्चिम भारतातील २७ प्रकल्पांमध्ये (महाराष्ट्र व गुजरात) १५.८९ अब्ज घन मीटर (५९ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या ६१ टक्के साठ्याच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक आहे, असे म्हणता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्रात गंभीर स्थिती, धरणात ५ टक्केच साठाराज्यातील १७ मोठ्या जलाशयांपैकी १३ प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा आहे. जायकवाडी, भीमा, येलदरी, गिरणा धरणांत तर केवळ ५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.पूर्व भाग अडचणीतझारखंड, ओडिशा, प. बंगाल व त्रिपुरा या पूर्वेतील राज्यांतही दशकातील सरासरीपेक्षा कमी जलसाठा आहे. महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात जलशयांतील पाणी पातळी घसरली आहे.