शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

प्रमुख धरणे आटली; देश पाणीटंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: August 27, 2015 04:29 IST

पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने

नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी देशातील प्रमुख ९१ धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली असून गेल्या १० वर्षांतील सरासरीपेक्षाही कमी साठा या प्रकल्पांमध्ये असल्याचे केंद्रीय जल आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे साहजिकच यंदा पाणीसंकट गहिरे होऊ शकते. पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी आगामी काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख धरण क्षेत्रात सध्या ९१ अब्ज घनमीटर पाणीसाठा असून तो वापरण्यायोग्य साठ्याच्या केवळ ५८ टक्के आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०३.५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता, तर गेल्या १० वर्षांतील सरासरी ९८.७ अब्ज घनमीटरपेक्षाही यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येऊ शकते.उत्तर व मध्य भारत वगळता देशातील जलाशयांतील पाणीसाठा समाधानकारक नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. पश्चिम भारतातील २७ प्रकल्पांमध्ये (महाराष्ट्र व गुजरात) १५.८९ अब्ज घन मीटर (५९ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या ६१ टक्के साठ्याच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक आहे, असे म्हणता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्रात गंभीर स्थिती, धरणात ५ टक्केच साठाराज्यातील १७ मोठ्या जलाशयांपैकी १३ प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा आहे. जायकवाडी, भीमा, येलदरी, गिरणा धरणांत तर केवळ ५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.पूर्व भाग अडचणीतझारखंड, ओडिशा, प. बंगाल व त्रिपुरा या पूर्वेतील राज्यांतही दशकातील सरासरीपेक्षा कमी जलसाठा आहे. महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात जलशयांतील पाणी पातळी घसरली आहे.