शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

गिरणा नदीवरील बंधारा कायम ठेवावा निवेदन : उत्राण गु.ह.येथील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाला साकडे

By admin | Updated: December 16, 2015 23:50 IST

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.
उत्राण परिसरातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता ग्रामस्थांकडून स्वखर्चाने गिरणा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधार्‍यातून खालच्या गावांना पाणी जाण्यासाठी मोठा विसर्ग आहे. या बंधार्‍यात जास्तीत जास्त एक ते दोन दिवस पाणी साठा राहत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होत असते.
जिल्हाधिकार्‍यांनी गिरणा नदीवरील बंधारे तोडण्याचे आदेश दिल्यानंतर या बंधार्‍याच्या बाजूने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या बंधार्‍याच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून तसेच शिक्षण व व्यापारानिमित्त अन्य ठिकाणी स्थाईक झालेल्या ग्रामस्थांकडून लोकवर्गणी करीत १६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला आहे. यावर्षी पाणी टंचाईची स्थिती असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी बंधारे तोडण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने हा बंधारा तोडल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊन आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचा विचार करून उत्राण गु.ह.तील हा बंधारा कायम ठेवावा अशी मागणी सरपंच अनिल महाजन, डॉ.मगन महाजन, डॉ.भास्कर पाटील, मधुकर महाजन, सुरेश महाजन, संतोष मोरे, खंडू कोळी, सुभाष कोळी, प्रदीप भालेराव यांनी केली आहे.

कोट
जिल्हा प्रशासनाने बंधारे तोडण्यासाठी अडथळा आणणार्‍या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल मात्र बंधारा तोडू देणार नाही. बंधारा तोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आमचे प्राण घ्यावे, त्यानंतर बंधारा तोडावा.
अनिल महाजन, सरपंच, उत्राण गु.ह.