शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

गिरणा नदीवरील बंधारा कायम ठेवावा निवेदन : उत्राण गु.ह.येथील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाला साकडे

By admin | Updated: December 16, 2015 23:50 IST

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.

जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.
उत्राण परिसरातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता ग्रामस्थांकडून स्वखर्चाने गिरणा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधार्‍यातून खालच्या गावांना पाणी जाण्यासाठी मोठा विसर्ग आहे. या बंधार्‍यात जास्तीत जास्त एक ते दोन दिवस पाणी साठा राहत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होत असते.
जिल्हाधिकार्‍यांनी गिरणा नदीवरील बंधारे तोडण्याचे आदेश दिल्यानंतर या बंधार्‍याच्या बाजूने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या बंधार्‍याच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून तसेच शिक्षण व व्यापारानिमित्त अन्य ठिकाणी स्थाईक झालेल्या ग्रामस्थांकडून लोकवर्गणी करीत १६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला आहे. यावर्षी पाणी टंचाईची स्थिती असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी बंधारे तोडण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने हा बंधारा तोडल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊन आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचा विचार करून उत्राण गु.ह.तील हा बंधारा कायम ठेवावा अशी मागणी सरपंच अनिल महाजन, डॉ.मगन महाजन, डॉ.भास्कर पाटील, मधुकर महाजन, सुरेश महाजन, संतोष मोरे, खंडू कोळी, सुभाष कोळी, प्रदीप भालेराव यांनी केली आहे.

कोट
जिल्हा प्रशासनाने बंधारे तोडण्यासाठी अडथळा आणणार्‍या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल मात्र बंधारा तोडू देणार नाही. बंधारा तोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आमचे प्राण घ्यावे, त्यानंतर बंधारा तोडावा.
अनिल महाजन, सरपंच, उत्राण गु.ह.