शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

सायबर क्राइममध्ये महाराष्ट्र दुसरा

By admin | Updated: July 23, 2015 01:07 IST

बदनामी करण्यापासून राष्ट्रविरोधी कारवायापर्यंत सोशल मीडियाचा वारेमाप वापर होत असल्याची ओरड असतानाच या माध्यमावर देखरेख ठेवण्यासाठी

नवी दिल्ली : बदनामी करण्यापासून राष्ट्रविरोधी कारवायापर्यंत सोशल मीडियाचा वारेमाप वापर होत असल्याची ओरड असतानाच या माध्यमावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार कोणत्याच प्रकारचे विशेष नेटवर्क स्थापन करणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. त्याचवेळी ताज्या आकडेवारीनुसार देशात सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र क्रमांक दोनचे राज्य ठरल्याची धोक्याची घंटाही वाजविली.डाटा सिक्युरिटी कौन्सील आॅफ इंडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यातील जागरूकता व संबंधित पोलास यंत्रणेच्या प्रशिक्षणासाठी सायबर कायदा व विज्ञान प्रयोगशाळा मुंबई व पुण्यात स्थापण्यात आल्याने सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करण्याचे काम जलद होत असल्याचे सांगण्यात आले. मागील तीन वर्षांत सायबर क्राईमच्या सर्वाधिक तक्रारी व गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून अटकेच्या कारवाईत मात्र उत्तरप्रदेश अव्वल आहे. देशाची राजधानी व गुन्हेगारी जगाचे लक्ष्य ठरलेल्या दिल्लीत व सायबर हब असलेल्या आंध्रप्रदेशाच्या हैद्राबादेत अनुक्रमे २३७ व २८२ तक्रारी गेल्या वर्षभरात दाखल झाल्या.गृह विभागाने ताज्या माहितीत म्हटले आहे की, आय टी अधिनियम, भारतीय दंडविधान तसेच स्थानिक कायद्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली.देशातील २९ राज्यांत मागील वर्षी ९,३२२ तक्रारी दाखल झाल्या असून ५,६४३ जणांना अटक करण्यात आली. इंडियन कंम्पुटर इमरजंसी रिस्पाँसच्या माध्यमातून तक्रारींचे विश्लेषण केले जाते.