शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खननात महाराष्ट्र पुढे

By admin | Updated: March 25, 2017 00:18 IST

खनिजांच्या अवैध उत्खननाचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. हे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खनिज चोरांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनही हे सत्र थांबलेले नाही.

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीखनिजांच्या अवैध उत्खननाचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. हे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खनिज चोरांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनही हे सत्र थांबलेले नाही. खाणमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात अवैध उत्खननाचे १,०२,८१४ प्रकार उजेडात आले आहेत. यात २०१३-१४ मध्ये ३६,४७६, २०१४-१५ मध्ये ३२,७१७ आणि २०१५-१६ दरम्यान ३३,६२१ प्रकार समोर आले होते. ठेवत नाही आकडेवारी -भाजपाच्या किरण खेर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गोयल यांनी लोकसभेत सांगितले की, अवैध उत्खननाबाबत केंद्रीय मंत्रालय पातळीवर माहिती ठेवली जात नाही. राज्य सरकारकडून उत्खननाबाबत तिमाही अहवाल मिळत असतो, असे ते म्हणाले. उत्खननप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, खाण मंत्रालयाकडे याची आकडेवारी उपलब्ध नाही. २२ विशेष दल-एमएमडीआर कायद्यात सुधारणा करून बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना दंड आकारण्याची तरतूद कठोर करण्यात आली आहे. अवैध उत्खनन थांबविण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेशासह २२ राज्यांत कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. गौण खनिज चोरीच्या या घटनांत राज्य सरकारने चोरांकडून मोठा दंडही वसूल केला आहे. गेल्या तीन वर्षांत १६४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी २०१३-१४ मध्ये ५१ कोटी रुपये, २०१४-१५ मध्ये ४२ कोटी रुपये आणि २०१५-१६ दरम्यान ७१ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. अवैध उत्खननावर उपग्रहाद्वारे लक्ष-याचबरोबर उत्खनन निगराणीप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यात सामान्य नागरिकही अवैध उत्खननाची तक्रार करू शकतात. उपग्रहांद्वारे अवैध उत्खननावर नजर ठेवण्यात येते. या प्रणालीत खनिज पट्ट्यात अतिरिक्त उत्खनन होत असल्यास त्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात येते.मध्य प्रदेशात खनिजांच्या अवैध उत्खननाचे कमी प्रकार उजेडात आले. तथापि, अधिक दंड वसूल करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत येथे जवळपास १६७ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ११० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.